शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मंडळस्तरावर मिनी वेधशाळा

By admin | Updated: June 9, 2017 00:55 IST

हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर

हवामानाची अचूक आकडेवारी मिळणार : थेट पुणे येथून नियंत्रित होणारराजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर (आर.आय.) स्वयंचलित वेधशाळा उभारण्यात येत आहेत. उपग्रहाद्वारे या वेधशाळेतील माहिती महावेध पुणे या शासनाच्या अधिकृत हवामान केंद्रात संकलित होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुका स्तराअंतर्गत येणाऱ्या मंडळस्तरावर त्यांची उभारणी करण्यात येत आहे.चिमूर तालुक्यात खडसंगी, भिसी, नेरी, शंकरपूर, मासळ, जांभुळघाट, चिमूर याठिकाणी अशा वेधशाळा उभारण्यात येत आहेत. हवामान आधारित फळ पीक तसेच इतर पीक नियोजन करण्याचे धोरण शासनाचे आहे.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळणे, तसेच नुकसान झाल्यास त्या भागातील हवामान त्या काळात कसे होते, त्याची माहिती घेणे यासह शेतकऱ्यांना हवामानाची पुर्वसुचना देणे, या उद्देशाने मंडळ स्तरावर वेधशाळा उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कृषी विभाग त्यासाठी आग्रही असून मंडळस्तरांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.मिनी वेधशाळा स्वरूपात असलेल्या या वेधशाळेमध्ये हवेचा वेग, दिशा, वातावरणातील आर्दता, पावसाचे प्रमाण, तापमान यासह इतर बाबींची माहिती संकलित केली जाणार आहे. ही सर्व उपकरणे संगणकाद्वारे उपग्रहाशी जोडली जातील. आॅनलाईन डाटा हा ‘महावेध’ या शासनाच्या अधिकृत केंद्रात संकलित होणार आहे. त्याची माहिती व प्रत जिल्हाधिकाऱ्यांनादेखील मिळणार आहे.सर्वच उपकरणे स्वयंचलितज्याठिकाणी ही उपकरणे बसवली जातील तेथे मनुष्यबळाची कुठलीही गरज राहणार नाही. सर्व उपकरणे ही संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे येथील महावेधच्या कार्यालयातून ती माहिती संकलित केली जाणार आहे. फक्त ज्या भागात हे उपकरणे बसविले जातील, तिथे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीवर राहणार आहे.विजेची आवश्यकता नाहीहवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात येणाऱ्या या उपकरणांना विजेची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारण उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाणार आहे. त्याद्वारेच उपकरणातील डाटा पाठविला जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातदेखील या उपकरणाकरिता विजेविना काही समस्या उद्भवणार नाही.पीक व्यवस्थापनासाठी होणार मदतयापुढे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन आता कुठलेही अनुदान देणार नाही. केवळ पीक विम्याद्वारे ती नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून भरपाई योग्य आणि पुरेशी मिळावी, याकरिता या वेधशाळा उपकरणाकडून मिळणाऱ्या अहवालाचाही उपयोग होणार आहे.हवामानाचा अंदाज घेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. हवामानाची पूर्वसूचना देणे, कुठल्या भागात किती पाऊस पडला, हवेचा वेग आणि आर्दता किती राहिली, याची अचुक माहिती याद्वारे मिळणार आहे. कृषी विभागासाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे.- एम. पी. पवार, तालुका कृषी अधिकारी, चिमूर