शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

जिल्ह्यात मंडळस्तरावर मिनी वेधशाळा

By admin | Updated: June 9, 2017 00:55 IST

हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर

हवामानाची अचूक आकडेवारी मिळणार : थेट पुणे येथून नियंत्रित होणारराजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर (आर.आय.) स्वयंचलित वेधशाळा उभारण्यात येत आहेत. उपग्रहाद्वारे या वेधशाळेतील माहिती महावेध पुणे या शासनाच्या अधिकृत हवामान केंद्रात संकलित होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुका स्तराअंतर्गत येणाऱ्या मंडळस्तरावर त्यांची उभारणी करण्यात येत आहे.चिमूर तालुक्यात खडसंगी, भिसी, नेरी, शंकरपूर, मासळ, जांभुळघाट, चिमूर याठिकाणी अशा वेधशाळा उभारण्यात येत आहेत. हवामान आधारित फळ पीक तसेच इतर पीक नियोजन करण्याचे धोरण शासनाचे आहे.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळणे, तसेच नुकसान झाल्यास त्या भागातील हवामान त्या काळात कसे होते, त्याची माहिती घेणे यासह शेतकऱ्यांना हवामानाची पुर्वसुचना देणे, या उद्देशाने मंडळ स्तरावर वेधशाळा उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कृषी विभाग त्यासाठी आग्रही असून मंडळस्तरांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.मिनी वेधशाळा स्वरूपात असलेल्या या वेधशाळेमध्ये हवेचा वेग, दिशा, वातावरणातील आर्दता, पावसाचे प्रमाण, तापमान यासह इतर बाबींची माहिती संकलित केली जाणार आहे. ही सर्व उपकरणे संगणकाद्वारे उपग्रहाशी जोडली जातील. आॅनलाईन डाटा हा ‘महावेध’ या शासनाच्या अधिकृत केंद्रात संकलित होणार आहे. त्याची माहिती व प्रत जिल्हाधिकाऱ्यांनादेखील मिळणार आहे.सर्वच उपकरणे स्वयंचलितज्याठिकाणी ही उपकरणे बसवली जातील तेथे मनुष्यबळाची कुठलीही गरज राहणार नाही. सर्व उपकरणे ही संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे येथील महावेधच्या कार्यालयातून ती माहिती संकलित केली जाणार आहे. फक्त ज्या भागात हे उपकरणे बसविले जातील, तिथे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीवर राहणार आहे.विजेची आवश्यकता नाहीहवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात येणाऱ्या या उपकरणांना विजेची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारण उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाणार आहे. त्याद्वारेच उपकरणातील डाटा पाठविला जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातदेखील या उपकरणाकरिता विजेविना काही समस्या उद्भवणार नाही.पीक व्यवस्थापनासाठी होणार मदतयापुढे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन आता कुठलेही अनुदान देणार नाही. केवळ पीक विम्याद्वारे ती नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून भरपाई योग्य आणि पुरेशी मिळावी, याकरिता या वेधशाळा उपकरणाकडून मिळणाऱ्या अहवालाचाही उपयोग होणार आहे.हवामानाचा अंदाज घेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. हवामानाची पूर्वसूचना देणे, कुठल्या भागात किती पाऊस पडला, हवेचा वेग आणि आर्दता किती राहिली, याची अचुक माहिती याद्वारे मिळणार आहे. कृषी विभागासाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे.- एम. पी. पवार, तालुका कृषी अधिकारी, चिमूर