शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यात मंडळस्तरावर मिनी वेधशाळा

By admin | Updated: June 9, 2017 00:55 IST

हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर

हवामानाची अचूक आकडेवारी मिळणार : थेट पुणे येथून नियंत्रित होणारराजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व त्याअनुषंगाने पीक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात प्रत्येक मंडळ स्तरावर (आर.आय.) स्वयंचलित वेधशाळा उभारण्यात येत आहेत. उपग्रहाद्वारे या वेधशाळेतील माहिती महावेध पुणे या शासनाच्या अधिकृत हवामान केंद्रात संकलित होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुका स्तराअंतर्गत येणाऱ्या मंडळस्तरावर त्यांची उभारणी करण्यात येत आहे.चिमूर तालुक्यात खडसंगी, भिसी, नेरी, शंकरपूर, मासळ, जांभुळघाट, चिमूर याठिकाणी अशा वेधशाळा उभारण्यात येत आहेत. हवामान आधारित फळ पीक तसेच इतर पीक नियोजन करण्याचे धोरण शासनाचे आहे.त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान टाळणे, तसेच नुकसान झाल्यास त्या भागातील हवामान त्या काळात कसे होते, त्याची माहिती घेणे यासह शेतकऱ्यांना हवामानाची पुर्वसुचना देणे, या उद्देशाने मंडळ स्तरावर वेधशाळा उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कृषी विभाग त्यासाठी आग्रही असून मंडळस्तरांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.मिनी वेधशाळा स्वरूपात असलेल्या या वेधशाळेमध्ये हवेचा वेग, दिशा, वातावरणातील आर्दता, पावसाचे प्रमाण, तापमान यासह इतर बाबींची माहिती संकलित केली जाणार आहे. ही सर्व उपकरणे संगणकाद्वारे उपग्रहाशी जोडली जातील. आॅनलाईन डाटा हा ‘महावेध’ या शासनाच्या अधिकृत केंद्रात संकलित होणार आहे. त्याची माहिती व प्रत जिल्हाधिकाऱ्यांनादेखील मिळणार आहे.सर्वच उपकरणे स्वयंचलितज्याठिकाणी ही उपकरणे बसवली जातील तेथे मनुष्यबळाची कुठलीही गरज राहणार नाही. सर्व उपकरणे ही संगणकीय प्रणालीद्वारे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे येथील महावेधच्या कार्यालयातून ती माहिती संकलित केली जाणार आहे. फक्त ज्या भागात हे उपकरणे बसविले जातील, तिथे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीवर राहणार आहे.विजेची आवश्यकता नाहीहवामानाच्या माहितीसाठी उभारण्यात येणाऱ्या या उपकरणांना विजेची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारण उपकरणांना जोडलेल्या सौर बॅटरीद्वारे तेथे उर्जा निर्माण केली जाणार आहे. त्याद्वारेच उपकरणातील डाटा पाठविला जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातदेखील या उपकरणाकरिता विजेविना काही समस्या उद्भवणार नाही.पीक व्यवस्थापनासाठी होणार मदतयापुढे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन आता कुठलेही अनुदान देणार नाही. केवळ पीक विम्याद्वारे ती नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून भरपाई योग्य आणि पुरेशी मिळावी, याकरिता या वेधशाळा उपकरणाकडून मिळणाऱ्या अहवालाचाही उपयोग होणार आहे.हवामानाचा अंदाज घेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उपकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. हवामानाची पूर्वसूचना देणे, कुठल्या भागात किती पाऊस पडला, हवेचा वेग आणि आर्दता किती राहिली, याची अचुक माहिती याद्वारे मिळणार आहे. कृषी विभागासाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे.- एम. पी. पवार, तालुका कृषी अधिकारी, चिमूर