शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जि.प.ची कोट्यवधींची विकासकामे लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:34 IST

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधींची विकासकामे अडकली होती. गुरूवारी निकाल जाहीर झाला. परिमणामी, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तकलादू कारणे पुढे न करता प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देनिवडणूक आचारसंहिता शिथिल

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधींची विकासकामे अडकली होती. गुरूवारी निकाल जाहीर झाला. परिमणामी, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तकलादू कारणे पुढे न करता प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. आचारसंहिता संपल्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेत फे रफ टका मारला असता अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली.लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील विविध विभागातील विकासकामांना बे्रक लागला होता. महिला बालकल्याण, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण पाणी पुरवठा, स्वच्छता व पाणी व्यवस्थापन, समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध विकास योजना ठप्प झाल्या होत्या.व्यक्तिगत व सामूहिक कल्याणाच्या योजनांचा निधी खर्च करण्यावर आचारसंहितेमुळे निर्बेंध आले होते. खरीप हंगाम सुरू झाला. परंतु, शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी रखडला आहे. रासायनिक खते व बियाणे पुरवठ्यासंदर्भात निर्णय आचारसंहितेत अडला होता. यातून मार्ग काढून खते व बियाण्यांची व्यवस्था करण्यात आली.मुख्य म्हणजे, आचारसंहितेच्या कालखंडात पदाधिकाºयांना धोरणात्मक निर्णय घेता आले नाही. विविध विभागप्रमुखांनी विकास योजनांचे प्रस्ताव तयार करून स्वाक्षरीसाठी फायल तयार ठेवल्या आहेत. पंचायत समितीकडून प्राप्त झालेल्या विविध प्रस्तावांवर निर्णय न झाल्याने संबंधित संवर्ग विकास अधिकारी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा करीत होते.अखर्चित निधीचे काय ?जिल्हा वार्षिक योजना (विभागांच्या एकत्रित योजनांची एकून तरतूद व खर्च) यामध्ये मोठी तफावत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. ग्रामीण विकास यंत्रणा (६२.२४) आणि कृषी विभागाने (५५.४७) मार्च अखेरपर्यंत निधी खर्च केला. उर्वरित नऊ विभागाने २५ टक्क्यांपेक्षा अधिक निधी खर्च केला नाही. बालकल्याण विभागाने तर केवळ १. ६२ टक्के निधी खर्च केला आहे. या अखर्चित निधीचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.पाणी टंचाई निवारणाला प्रथम प्राधान्य द्यावेदुष्काळ व पाणी टंचाईसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत शिथिलता आणली होती. परंतु, जि. प. प्रशासकीय यंत्रणा लोकसभा निवडणूक मतदान व मतमोजणी प्रक्रियेत गुंतल्याने प्रभावी उपाययोजना झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या उग्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. पदाधिकाºयांनी सर्वात आधी याच प्रश्नाला प्राधान्य दिले पाहिजे.कोट्यवधींची देयके अडलीराज्य व केंद्र शासनाकडून जि. प. मार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची कोट्यवधींची देयके आचारसंहितेमुळे अडली आहेत. ही देयके मंजूर करण्यासाठी प्रशासनाला पाऊल उचलून पुढील कामांचे नियोजनही करावे लागणार आहे. अन्यथा जिल्ह्यातील विकासकामांवर याचा अनिष्ठ परिणाम होऊ शकतो.लाभार्थ्यांची वाढणार गर्दीव्यक्तिगत लाभाच्या योजनांची लाखो रूपयांची देयक प्रलंबित आहेत. लाभार्थ्यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाºयांना विचारणा केल्यास निवडणूक आचारसंहितेकडे बोट दाखविल्या जात होते. आचारसंहिता शिथिल होताच समस्यांचा निपटारा होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध योजनांचे लाभार्थी जिल्हा परिषदेत गर्दी करणार आहेत.