शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

लाखो डीटीएडधारक नोकरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 14, 2014 01:55 IST

महाराष्ट्रात दरवर्षी अध्यापक पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांच्या रिक्त पदाच्या तुलनेत सहापटीने जास्त आहे.

गडचांदूर : महाराष्ट्रात दरवर्षी अध्यापक पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांच्या रिक्त पदाच्या तुलनेत सहापटीने जास्त आहे. राज्यात सध्या जवळपास पाच लाखाच्या वर डीटीएडधारक बेरोजगार आहेत. एकीकडे बेरोजगारांची फौज तयार होत असताना शासनाने मात्र २००५ पासून तब्बल एक हजार ४०५ अध्यापक विद्यालयांना मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडून नवीन अध्यापक विद्यालयांना एनसीटीई अधिनियम १९९३ नुसार मान्यता दिली जाते. मान्यता मिळालेल्या अध्यापक विद्यालयांना राज्य शासनाकडून संलग्नता देण्यात येते. डीटीएड् प्रवेश क्षमता प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याने राज्य शासनाने २००६-०७ मध्येच केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तरीही एनसीटीईने अध्यापक विद्यालयात मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरुच ठेवली होती. गेल्या काही वर्षांत राज्यात अध्यापक विद्यालयांना मान्यता मिळाल्याने विषम परिस्थिती निर्माण झाली आहे.२००५ ते २०१३ या नऊ वर्षांच्या शैक्षणिक सत्रात राज्यातील आठ विभागांतर्गत १ हजार ४०५ अध्यापक विद्यालयांना मान्यता दिली आहे. त्यामुळे दरवर्षी अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन भावी शिक्षकांची फौज बाहेर पडत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी देणे शक्य नसल्याने शासनाने सीईटी लागू केली. २०१० मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागेसाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यावेळी १ लाख ८५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांपैकी १५ हजार १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. उर्वरीत ७० हजार ७८८ विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिले.बेरोजगाराच्या तुलनेत शिक्षक भरतीचे प्रयत्न अत्यल्प असल्याने दरवर्षी अध्यापक पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)