शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

लाखो डीटीएडधारक नोकरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 14, 2014 01:55 IST

महाराष्ट्रात दरवर्षी अध्यापक पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांच्या रिक्त पदाच्या तुलनेत सहापटीने जास्त आहे.

गडचांदूर : महाराष्ट्रात दरवर्षी अध्यापक पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांच्या रिक्त पदाच्या तुलनेत सहापटीने जास्त आहे. राज्यात सध्या जवळपास पाच लाखाच्या वर डीटीएडधारक बेरोजगार आहेत. एकीकडे बेरोजगारांची फौज तयार होत असताना शासनाने मात्र २००५ पासून तब्बल एक हजार ४०५ अध्यापक विद्यालयांना मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडून नवीन अध्यापक विद्यालयांना एनसीटीई अधिनियम १९९३ नुसार मान्यता दिली जाते. मान्यता मिळालेल्या अध्यापक विद्यालयांना राज्य शासनाकडून संलग्नता देण्यात येते. डीटीएड् प्रवेश क्षमता प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याने राज्य शासनाने २००६-०७ मध्येच केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तरीही एनसीटीईने अध्यापक विद्यालयात मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरुच ठेवली होती. गेल्या काही वर्षांत राज्यात अध्यापक विद्यालयांना मान्यता मिळाल्याने विषम परिस्थिती निर्माण झाली आहे.२००५ ते २०१३ या नऊ वर्षांच्या शैक्षणिक सत्रात राज्यातील आठ विभागांतर्गत १ हजार ४०५ अध्यापक विद्यालयांना मान्यता दिली आहे. त्यामुळे दरवर्षी अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन भावी शिक्षकांची फौज बाहेर पडत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी देणे शक्य नसल्याने शासनाने सीईटी लागू केली. २०१० मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागेसाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यावेळी १ लाख ८५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांपैकी १५ हजार १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. उर्वरीत ७० हजार ७८८ विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिले.बेरोजगाराच्या तुलनेत शिक्षक भरतीचे प्रयत्न अत्यल्प असल्याने दरवर्षी अध्यापक पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)