शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरची सातऱ्यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबले

By admin | Updated: April 14, 2017 00:47 IST

तालुक्यात मिरचीचे पीक नसले तरी या पिकामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मिरचीच्या सातऱ्या तालुक्यात करण्यात येत आहेत.

गावातच रोजगार उपलब्ध : अनेकांच्या हाताला मिळाले कामनागभीड : तालुक्यात मिरचीचे पीक नसले तरी या पिकामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मिरचीच्या सातऱ्या तालुक्यात करण्यात येत आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबले आहे.नागभीड तालुक्यात उद्योगाची वानवा आहे. नागभीड परिसरात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली आहे. त्याकरिता जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. परंतु संपूर्ण तालुक्यात एकही मध्यम किंवा मोठा उद्योग नाही. तेथे कवेळ दाल मिल आणि राईस मिल पलीकडे दुसरा उद्योग नाही. तालुक्याचे प्रमुख पीक धान आहे. या पिकाच्या संवर्धानासाठी सिंचनाची कोणतीच व्यवस्था नसल्याने या पिकाला दरवर्षी नैसर्गिक पावसावर अवलंबून राहावे लागते. त्याच वेळी निसर्ग नेहमीच दगा देत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. गत २०-२५ वर्षांपासून दुष्काळी स्थिती उद्भवत असल्याने तालुक्याील मजूर आणि काही शेतकरीही रोजगार मिळविण्यासाठी नजीकच्या नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात स्थलांतर करीत होते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यामध्ये मिरच्या साफ करण्याचे सातरे सुरू करण्यात आले आहेत. तेथे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. दोन-तीन वर्षांपासून कानपा, बाह्मणी येथे सुरू झालेल्या सातऱ्यांना मजुरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आता हे सातरे जेथे-जेथे मजूर उपलब्ध होत आहेत, त्या-त्या परिसरात सुरू होत आहेत. तध्ये हे सातरे तालुक्यातील कानपा, मोहाळी, बाह्मणी, नवखळा, भिकेश्वर, कोर्धा, नवेगाव पांड आदी गावांमध्ये सुरू झाले आहेत. हे काम शरीराला नुकसानकारक असले तरी तालुक्यात रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने नाईलाजास्तव सातऱ्याचे काम केले जात आहे. एका सातऱ्यावर १५० ते २०० मजूर कार्यरत आहेत. त्यांनी साफ केलेली मिरची आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांकडून उपलब्ध होते. या मिरचीच्या मुक्या काढल्या जातात. त्याकरिता एका पोत्यामागे मिरची सफाईसाठी ठराविक रक्कम दिली जाते. (तालुका प्रतिनिधी)शासकीय यंत्रणा रोजगारात अपयशीरोजगारापासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता केंद्र व राज्य सरकारे राष्ट्रीय आणि मुख्यमंत्री ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात काही अपवाद वगळता रोजगार उपलब्ध करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. रोजगाराअभावी मजुरांना मिरचीच्या सातऱ्याचे जोखमीचे काम करावे लागत आहे. विद्युत अपघाताने सातरा जळालाचालू पंधरवड्यात भिकेश्वर येथे मिरची सातऱ्यावर विद्युत तार तुटून पडली. त्यामुळे मिरचीचा सातरा जळून खाक झाला. तेथील मिरची जळाल्याने परिसरातील वातावरण श्वास घेण्यायोग्य नव्हते. अनेक सातरे अशा धोकादायक ठिकाणी तयार करण्यात आली आहेत. ती सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक आहे. त्यामुळे भिकेश्वरप्रमाणे अपघात घडणार नाहीत.