शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मिरची सातऱ्यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबले

By admin | Updated: April 14, 2017 00:47 IST

तालुक्यात मिरचीचे पीक नसले तरी या पिकामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मिरचीच्या सातऱ्या तालुक्यात करण्यात येत आहेत.

गावातच रोजगार उपलब्ध : अनेकांच्या हाताला मिळाले कामनागभीड : तालुक्यात मिरचीचे पीक नसले तरी या पिकामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मिरचीच्या सातऱ्या तालुक्यात करण्यात येत आहेत. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबले आहे.नागभीड तालुक्यात उद्योगाची वानवा आहे. नागभीड परिसरात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली आहे. त्याकरिता जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. परंतु संपूर्ण तालुक्यात एकही मध्यम किंवा मोठा उद्योग नाही. तेथे कवेळ दाल मिल आणि राईस मिल पलीकडे दुसरा उद्योग नाही. तालुक्याचे प्रमुख पीक धान आहे. या पिकाच्या संवर्धानासाठी सिंचनाची कोणतीच व्यवस्था नसल्याने या पिकाला दरवर्षी नैसर्गिक पावसावर अवलंबून राहावे लागते. त्याच वेळी निसर्ग नेहमीच दगा देत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. गत २०-२५ वर्षांपासून दुष्काळी स्थिती उद्भवत असल्याने तालुक्याील मजूर आणि काही शेतकरीही रोजगार मिळविण्यासाठी नजीकच्या नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात स्थलांतर करीत होते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यामध्ये मिरच्या साफ करण्याचे सातरे सुरू करण्यात आले आहेत. तेथे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. दोन-तीन वर्षांपासून कानपा, बाह्मणी येथे सुरू झालेल्या सातऱ्यांना मजुरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आता हे सातरे जेथे-जेथे मजूर उपलब्ध होत आहेत, त्या-त्या परिसरात सुरू होत आहेत. तध्ये हे सातरे तालुक्यातील कानपा, मोहाळी, बाह्मणी, नवखळा, भिकेश्वर, कोर्धा, नवेगाव पांड आदी गावांमध्ये सुरू झाले आहेत. हे काम शरीराला नुकसानकारक असले तरी तालुक्यात रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने नाईलाजास्तव सातऱ्याचे काम केले जात आहे. एका सातऱ्यावर १५० ते २०० मजूर कार्यरत आहेत. त्यांनी साफ केलेली मिरची आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांकडून उपलब्ध होते. या मिरचीच्या मुक्या काढल्या जातात. त्याकरिता एका पोत्यामागे मिरची सफाईसाठी ठराविक रक्कम दिली जाते. (तालुका प्रतिनिधी)शासकीय यंत्रणा रोजगारात अपयशीरोजगारापासून कोणीही वंचित राहू नये, याकरिता केंद्र व राज्य सरकारे राष्ट्रीय आणि मुख्यमंत्री ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात काही अपवाद वगळता रोजगार उपलब्ध करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. रोजगाराअभावी मजुरांना मिरचीच्या सातऱ्याचे जोखमीचे काम करावे लागत आहे. विद्युत अपघाताने सातरा जळालाचालू पंधरवड्यात भिकेश्वर येथे मिरची सातऱ्यावर विद्युत तार तुटून पडली. त्यामुळे मिरचीचा सातरा जळून खाक झाला. तेथील मिरची जळाल्याने परिसरातील वातावरण श्वास घेण्यायोग्य नव्हते. अनेक सातरे अशा धोकादायक ठिकाणी तयार करण्यात आली आहेत. ती सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक आहे. त्यामुळे भिकेश्वरप्रमाणे अपघात घडणार नाहीत.