शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

लग्नसोहळ्यात संगीताचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटानंतर आता पुन्हा धूमधडाक्यात विवाह सोहळे आयोजित केले जात आहे. मात्र लग्नसोहळ्यातील सनईचे सूर ...

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटानंतर आता पुन्हा धूमधडाक्यात विवाह सोहळे आयोजित केले जात आहे. मात्र लग्नसोहळ्यातील सनईचे सूर काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक काळात डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या वऱ्हाडांना विवाह सोहळ्यात चित्रपट गीतांपासून नृत्याचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘स्वरांजली’ची खास मेजवानी ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही लग्न समारंभासाठीही प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत होती. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पुन्हा लग्नसोहळे धूमधडाक्यात तसेच डीजेच्या आवारात साजरे होऊ लागले.

विवाह प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा क्षण. दोन वेगळे जीव साता जन्माच्या गाठीने एका विवाह बंधनात आयुष्यभरासाठी बांधले जातात. त्यांच्या भावी वाटचालीकरिता वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी नातलग, सगेसोयरे इष्टमित्रांना निमंत्रण दिले जाते. रीतिरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा थाटात पार पाडला जातो.

लग्नसोहळ्यात पूर्वी सनईचा सूर सर्वांच्या कानी पडायचा. त्या सनई चौघड्याचा रुबाब काही औरच होता. मात्र आधुनिक युगात सनई चौघड्यांची जागा डीजेनी घेतली. लग्नसोहळ्यात डीजेच्या तालावर मंडळींना विवाह मुहूर्ताचे भान राहत नाही. परिणामी त्याचा नाहक त्रास वधूपित्याला सहन करावा लागतो.

लग्नसोहळ्यात खास मेजवानी म्हणून गाण्यांची मैफल आयोजित केली जाते. यामध्ये एकापेक्षा एक गाण्यांची जुगलबंदी सादर करणारे कलावंत मंडळींना अक्षरश: भारावून टाकत असल्याने विवाह सोहळ्याची रंगत काही औरच असते. त्यामुळे लग्नसोहळ्याला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

वधूपित्याची मोठी कसरत होत असली तरी, वधूपित्याला आपल्या मुलीचे शुभमंगल थाटात पार पाडावे, असे वाटत असल्याने विवाह सोहळ्याचे रूप पूर्णत: बदलले आहे.