शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

मेडिकल विद्यार्थ्यांनो... बाँड सेवा करा किंवा १०,००,००० भरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST

शासकीय महाविद्यालयात एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे बाँड सेवा द्यावी लागत होती. पदवी झाल्यानंतर किंवा पीजी झाल्यानंतर ते ...

शासकीय महाविद्यालयात एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे बाँड सेवा द्यावी लागत होती. पदवी झाल्यानंतर किंवा पीजी झाल्यानंतर ते सेवा देऊ शकत होते. परंतु, यंदा कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची बंधनपत्रित सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे एमबीबीएस पदवी पूर्ण झालेल्या व इंटर्नशिप पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सेवा देणे बंधकारक आहे. यातून सवलत घ्यायची असल्यास दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत. या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

कोट

सध्याची आरोग्य स्थिती लक्षात घेता बंधपत्रित सेवा अनिवार्य करण्यास हरकत नाही. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता कमी होईल. गरजू लोकांना दिलासा मिळेल. राज्य शासनाच्या या निर्णयाशी मी पूर्णपणे सहमत आहे.

डॉ. आरती काचेकर, चंद्रपूर

---------

बाँड सेवा देण्यासाठी जबरदस्ती करणे योग्य नाही. कारण वैद्यकीय सेवा हृद्यातून देणे गरजेचे आहे. जबरदस्तीने सेवा दिल्यास रुग्ण आणि डॉक्टरांनाही योग्य नाही. त्यामुळे ज्यांना स्वेच्छेने बाँड सेवा द्यायची आहे, त्यांनाच सेवा देण्याची संधी द्यावी.

- डॉ. लालकृष्ण मूलवाणी, चंद्रपूर

----------

कोरोनाच्या लढ्यात डॉक्टरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे शासनाने बाँड सेवा अनिवार्य केली. रुग्णसेवा करण्याची ही मोठी संधी असल्याने इंटर्नशिप झालेले विद्यार्थी स्वेच्छेने बाँड सेवा देण्यास तयार आहेत. त्यातून अनुभवपण मिळेल आणि रुग्णसेवा केल्याचे वेगळे समाधान मिळेल. - डॉ. प्रीतम वनवे, एमबीबीएस, चंद्रपूर

-----

ग्रामीण भागात सेवा नकोरे बाबा

एमबीबीएसचे शिक्षण व इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर सेवा द्यावी लागते. बहुतांश विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाची तयारी करायची असते. परंतु, ग्रामीण भागात बाँड सेवा देण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांकडून नकारच मिळत असतो.

-----

बॉक्स

सवलतीसाठी एकही अर्ज नाही

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील सन २०१५ च्या एमबीबीएस बॅचमध्ये १०० विद्यार्थी होते. त्यापैकी ९५ विद्यार्थ्यांनी अंतिम सत्राची परीक्षा दिली. त्यापैकी ८८ जण बाँड सेवा देण्यासाठी पात्र ठरले आहेत. बाँड सेवा करायची नसल्यास १० लाख रुपये भरुन सवलत घेता येते. यासाठी २४ एप्रिलपासून अर्ज सुरु झाले आहे. मात्र, अद्याप एकही विद्यार्थ्यांनी अर्ज केला नसल्याची माहिती आहे.