शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती येथे मध्यस्थी जनजागृती

By admin | Updated: June 25, 2017 00:40 IST

मेडीएशन मॉनिटरिंग कमिटी, मेन मेडीएशन सेंटर, उच्च न्यायालय, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये...

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मेडीएशन मॉनिटरिंग कमिटी, मेन मेडीएशन सेंटर, उच्च न्यायालय, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती भद्रावती व तालुका विधिज्ञ संघ भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे ‘मध्यस्थी जनजागृती’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश निनाद अ. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर रिर्सोस पर्सन म्हणून शैलेश कंठे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष यू.ए. पलीकुंडावार व सचिव अ‍ॅड. जी.पी. मोरे उपस्थित होते.यावेळी सह दिवाणी न्यायाधीश शैलेश कंठे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, मध्यस्थी म्हणजे जो पक्षकारामधील असणारा वाद, तंटा परस्पर संमतीने सोडविण्याकरिता मदत करतो. मध्यस्थी एक गोपनीय, ऐच्छिक परस्पर सहभाग असणारी लवचिक प्रक्रिया आहे. मध्यस्थी कोणताही तोडगा थोपवित नाही. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये वकिलांचा सहभाग देखील अत्यंत महत्त्वाचा असून किंबहूना मध्यस्थीद्वारे संपविणे, याबाबतचे योग्य मार्गदर्शन हे वकील पक्षकारांना करीत असतात तसेच मानसिकदृष्ट्या समाधान मिळून, विविध मुद्यातील दरी कमी करून ‘जिंकलो व हरलो’ असा भाव न राहता सन्मानपूर्वक निकालाचा अवलंब करून, दुरावलेली मने पुन्हा स्नेहात बांधली जातात. मध्यस्थीमुळे लवकर निकाल लागून सामाजिक स्वास्थ सुधारते, सौहार्दाता वाढते, कमी खर्च, पैशाची व वेळेची बचत तसेच संपूर्ण कोर्ट फी परत मिळून पक्षकारांना याचा लाभ होतो. वैवाहिक प्रकरणातील असलेले हेवे-दावे मिटविण्याचा प्रयत्न किंवा नात्यातील गोडवा पुन्हा प्रस्थापित करण्याकरिताच आपला प्रयत्न नव्याने संसाराची घडी बसविणेसाठी पती-पत्नीमधील वाद न्यायालयात असण्यापेक्षा मध्यस्थी मार्फत मिटविणे योग्यच होईल असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अ‍ॅड. व्ही.एस. सूर्तीकर यांनी केले.