शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

महामार्गावरील आम्रवृक्षांची कत्तल

By admin | Updated: June 14, 2014 01:52 IST

तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे.

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड - तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचाच परिपाक म्हणून या आम्रवृक्षांची एकापाठोपाठ एक अशी कत्तल सुरु आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने नागभीड - तळोधी राज्य महामार्गावर सावरगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आम्रवृक्षांची मोठ्या उत्साहात लागवड केली. काही वर्षांंनंतर ही आम्रवृक्ष चांगलीच बहरली. आंब्यांची ही झाडे मोठी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे बंद केले. त्यामुळे आता या बहरलेल्या वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. जनकापूरपासून सावरगावपर्यंतच्या झाडांची तोड करण्यात आल्याचे दिसून येते. जनकापूरपासून सावरगावपर्यंतच्या अंतरावर किमना शंभर झाडे आहेत. मात्र कत्तलीमुळे ती उजाड झाली आहेत तर मोहित करणारे रस्तेही ओसाड झाल्याचे दिसून येते.एकिकडे शासन वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असले तरी त्याची फलनिष्पत्ती शुन्य आहे. शासनाचा हा खर्च फूकट जात आहे. आणि शासनाचाच एक भाग असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या अखत्यारीत असलेली झाडे राखता येऊ नयेत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.नागभीड - तळोधी- सावरगाव या मार्गावरील झाडांचे निरीक्षण केल्यास अनेक झाड्याच्या मोठमोठ्या फांद्या अनेकांनी लंपास केल्याचे दिसून येत आहे.काही वेळेस हे चोरटे या झाडांच्या सालींमध्ये विशिष्ट द्रव्य टाकून ते झाडच सुकवतात आणि नंतर त्याची तोड करतात, अशी माहिती काही जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अनेकदा जिवंत झाडावरच्या फांद्यावरच घाव घालत असल्याची माहिती आहे. वास्तविक या झाडांचे जतन व देखभाल करण्याची जबाबदारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. पण हा विभाग आपली जबाबदारी पार विसरत गेल्याचे एकंदर स्थितीवरुन दिसून येते. या झाडांना किड लागू नये म्हणून गेरु, चुणा लावण्याचाही सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडत चालला आहे. वरिष्ठ कार्यालयाने या बाबीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.