शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महामार्गावरील आम्रवृक्षांची कत्तल

By admin | Updated: June 14, 2014 01:52 IST

तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे.

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड - तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचाच परिपाक म्हणून या आम्रवृक्षांची एकापाठोपाठ एक अशी कत्तल सुरु आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने नागभीड - तळोधी राज्य महामार्गावर सावरगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आम्रवृक्षांची मोठ्या उत्साहात लागवड केली. काही वर्षांंनंतर ही आम्रवृक्ष चांगलीच बहरली. आंब्यांची ही झाडे मोठी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे बंद केले. त्यामुळे आता या बहरलेल्या वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. जनकापूरपासून सावरगावपर्यंतच्या झाडांची तोड करण्यात आल्याचे दिसून येते. जनकापूरपासून सावरगावपर्यंतच्या अंतरावर किमना शंभर झाडे आहेत. मात्र कत्तलीमुळे ती उजाड झाली आहेत तर मोहित करणारे रस्तेही ओसाड झाल्याचे दिसून येते.एकिकडे शासन वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असले तरी त्याची फलनिष्पत्ती शुन्य आहे. शासनाचा हा खर्च फूकट जात आहे. आणि शासनाचाच एक भाग असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या अखत्यारीत असलेली झाडे राखता येऊ नयेत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.नागभीड - तळोधी- सावरगाव या मार्गावरील झाडांचे निरीक्षण केल्यास अनेक झाड्याच्या मोठमोठ्या फांद्या अनेकांनी लंपास केल्याचे दिसून येत आहे.काही वेळेस हे चोरटे या झाडांच्या सालींमध्ये विशिष्ट द्रव्य टाकून ते झाडच सुकवतात आणि नंतर त्याची तोड करतात, अशी माहिती काही जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अनेकदा जिवंत झाडावरच्या फांद्यावरच घाव घालत असल्याची माहिती आहे. वास्तविक या झाडांचे जतन व देखभाल करण्याची जबाबदारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. पण हा विभाग आपली जबाबदारी पार विसरत गेल्याचे एकंदर स्थितीवरुन दिसून येते. या झाडांना किड लागू नये म्हणून गेरु, चुणा लावण्याचाही सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडत चालला आहे. वरिष्ठ कार्यालयाने या बाबीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.