शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही अनेकांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी देत होती. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला. बºयाच केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आपल्या पावली परत जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ लाखांहून जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, यातील अनेकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोग्य विभागाने दोनही डोसचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देणे सुरू केले आहे.जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी देत होती. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला. बºयाच केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आपल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांचीही संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीबाबतही काही गैरसमज पसरविण्यात आले होते. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच लसीकरण केंद्रांवर जागृतीचे बॅनर लावणे, घरोघरी भेटी देऊन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही केवळ हलगर्जीपणामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यकदोन्ही कोविड डोस संसर्गापासून बचाव करतात. प्रथम डोस प्रभावीच आहे. पण, दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोस शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक प्रकार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे, आरोग्य विभागाचा सल्ला स्वीकारावा.

नेमकी अडचण काय ?

दुसरा डोस घेतल्यास आतील रिसेप्टर्स व्हायरसने शरीरात प्रवेश करताच सिस्टमला सतर्क करतात व कोविड संक्रमणापासून वाचवतात, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून सतत सांगितली जात आहे. पण, निष्काळजीपणा व केंद्रात जाऊन एक-दोनदा परत आल्याने आलेली नकारात्मकता, आदी कारणे दुसरा डोस घेण्यास अडचणी निर्माण करीत आहेत.

पहिला घेतल्यास दुसरा डोस मिळतोचदुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. पण दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळतोच, असा दावा प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी स्वत: व कुटूंबाच्या आरोग्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या