शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात कुपोषणाचे फेरसर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:15 IST

भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धिमान होण्यासाठी कुपोषण निर्मुलन आवश्यक आहे. शासन विविध मार्गानी कुपोषण मुक्तीचा प्रयत्न करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाचे पुर्नसर्वेक्षण करण्याच्या सुचना आपण संबंधित विभागाला दिल्या आहे.

ठळक मुद्देनरेश गित्ते : सुदृढ समाजासाठी कुपोषण मुक्ती आवश्यक, विशेष मोहीम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धिमान होण्यासाठी कुपोषण निर्मुलन आवश्यक आहे. शासन विविध मार्गानी कुपोषण मुक्तीचा प्रयत्न करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कुपोषणाचे पुर्नसर्वेक्षण करण्याच्या सुचना आपण संबंधित विभागाला दिल्या आहे. यावर आपण स्वत: लक्ष ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राजमाता जिजाऊ आरोग्य अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात कुपोषण मुक्तीचा लढा उभारणारे डॉ. नरेश गिते यांनी भंडारा जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली. प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासोबतच भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि बुध्दीमान करण्यासाठी ते जिल्हाभरात विशेष प्रयत्न करणार आहे. भंडारा जिल्ह्यात कुपोषणाच्या तीव्र (सॅम) गटात ८२ तर मध्यम तीव्र (मॅम) गटात १२५ बालके आढळून आली आहेत. मात्र ही आकडेवारी समाधानकारक नाही. यापेक्षा दहापट मुले कुपोषणाच्या श्रेणीत असण्याची शक्यता आहे. त्यासाठीच आपण संपूर्ण यंत्रणेला मॅम व सॅम दोन्ही गटात कुपोषणाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात मॅम गटात चार ते पाच हजार मुले निघण्याची शक्यता आहे. या मुलांचा वाढीसाठी आणि विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. गिते यांनी सांगितले. नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असताना १७ हजार कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले. मानवी विकासावर खर्च करण्याची गरज आहे. यातून बाळाचे आयुष्य सुधारते. शिक्षणाची गुणवत्ता वाढते, असे सांगितले. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशन सारखे राबविण्यात येते. यातून देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कुपोषणाची समस्या कमी करण्याचा यातून प्रयत्न सुरु आहे.कुपोषण म्हणजे काय?पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची स्थिती निर्माण होते. त्याला कुपोषण म्हणतात. त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल. कुपोषण म्हणजे आजार नव्हे. परंतु योग्य आहार, उपासमार व जीवनसत्वाचा अभाव याचा परिणाम मुलांचा शरीरावर होते. मुल लहानश्या आजाराने अशक्त दिसू लागते. बाळाची वाढ खुंटते. याला कुपोषण म्हणतात.प्रती बालक दोन हजार मदतकुपोषण मुक्तीसाठी प्रती बालक दोन हजार रुपये देण्याचे प्रयत्न प्रशासनाच्यावतीने केले जातील. ग्रामपंचायतीना चौदाव्या वित्त आयोगातून निधी प्राप्त होतो. त्यातील ठराविक निधी कुपोषणमुक्तीसाठी वापरण्याचा प्रयत्न आहे. दोन हजार रुपये अंगणवाडीताईंकडे देऊन एक हजार रुपये बालकांचा आहार आणि एक हजार रुपयांची औषधी त्यातून खरेदी केली जाईल. यावर सरपंचाचे अप्रत्यक्ष नियंत्रण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.पहिले हजार दिवस महत्त्वाचेबाल्यावस्था हा मानवाचा वाढीचा व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. गरोदरपणात स्त्रियांना व जन्मानंतर बालकांना पहिल्या दोन वर्षात योग्य आहार न मिळाल्यास त्याचे दुरगामी परिणाम होतात. त्यामुळे गर्भधारणेपासून पहिले एक हजार दिवस म्हणजे जन्मानंतर २४ महिन्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. जन्माला येणारे बाळ ४९ ते ५० सेंटीमीटरचे असावे, त्याचे वजन साधारणत: तीन किलो असले तर ते सुदृढ असते. कुपोषण मुख्यत: पहिल्या दोन वर्षातच निर्माण होते. परंतु अद्यापही लोकांना पहिल्या दोन वर्षातील आहाराचे महत्वच कळले नाही. गर्भावस्थेत मातेने सकस आहार घेतला पाहिजे. तसेच बाळालाही सकस आहार देण्याची गरज आहे, असे डॉ. गिते यांनी सांगितले.