शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त सीमावर्ती गावात मलेरियाचा कोप

By admin | Updated: October 2, 2015 05:49 IST

जिवती तालुक्यातील वादग्रस्त सीमावर्ती गावांमध्ये सध्या मलेरियाचा कोप सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आधीच या गावांवर कोपली

संघरक्षित तावाडे ल्ल जिवतीजिवती तालुक्यातील वादग्रस्त सीमावर्ती गावांमध्ये सध्या मलेरियाचा कोप सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आधीच या गावांवर कोपली असताना हे नवे संकट गोरगरीबांच्या जिवावर उठले आहे. महाराष्ट्र- तेलंगाणा या दोन राज्याच्या कचाट्यात अडकलेल्या कोटा, शंकरलोधी, मुकदमगुडा व परमडोली या चारही गाववत हिवतापाने कहर घातला आहे. केवळ कहरच नाही तर या आठवड्यात एकूण चार जणांचा बळी गेला आहे.महाराष्ट्र-तेलंगाणा या दोन राज्याच्या सीमावादात जिवती तालुक्यातील १४ गावे भरडली जात आहे. विकासाच्या दृष्टीने ही गावे उपेक्षितच आहेत. अशातच या १४ गावांपैकी कोटा, शंकरलोधी, मुकदमगुडा व परमडोली या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून हिवतापाची साथ सुरू आहे. अनेक रुग्ण हिवतापाने ग्रस्त असतानाही आरोग्य यंत्रणेला त्याचे काही सोयरसुतक दिसून आले नाही. याचा परिपाक म्हणून कोटा येथील मुद्रिकाबाई नारायण मोरे (२६) व दिगांबर नारायण गोपले (२५) यांचा मलेरियाने बळी गेला. शंकरलोधी येथील आशीद सुधाकर काटे या पाच वर्षाच्या बालकाचाही मलेरियानेच मृत्यू झाला. तर मुकदमगुडा येथील वर्ग दुसरीचा विद्यार्थी भिमजीत प्रकाश खंदारे याचाही याच आजाराने बळी घेतला. या आठ दिवसात परिसरातील चार जणांचा मलेरियाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. मुद्रिकाबाई नारायण मोरे ही विवाहित महिला असून तिला तीन लहान मुले आहेत. यापैकी एका केवळ सहा महिन्याचा आहे. या महिलेचे दोन मुलेही मलेरिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या उपचारासाठी ही महिला आदिलाबाद येथे गेली. मुलाची काळजी घेता घेता स्वत: दगावली. तर दिगांबर नागनाथ गोपले यालाही एक लहान मुलगी आहे. त्यांचा काल बुधवारी मृत्यू झाला. आजाराने बळी जात असल्याने भीतीचे वातावरण दिसून येत आहे. संपूर्ण गावामध्ये आणि परिसरातही तापाची साथ असून नागरिकही मोठ्या प्रमाणावर धास्तावलेले दिसत आहेत. (संबंधित वृत्त /४)गावातील प्रत्येक कुटुंब आजाराने ग्रस्तप्रस्तुत प्रतिनिधीने गावांना भेट दिली असता कोटा व शंकरलोधी या दोन्ही गावात प्रत्येक घरी सर्व व्यक्ती आजारी असल्याचे दिसते. कोणाला मलेरिया तर कोणाला विषमज्वराने (टायफाईड) ग्रासले आहे. लहानापासून तर वृध्दांपर्यंत सर्वच आजारी आहेत. मुकदमगुडा व परमडोली येथेही अनेकांना मलेरियाने ग्रासले आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षकोटा हे गाव परमडोली तर शंकरलोधी हे गाव पुडियाल मोहदा ग्रामपंचायती अंतर्गत येते. पण येथील कर्मचारी गावाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विहिरीत किंवा बोरींगमध्ये ब्लिचींग पावडर टाकले जात नाही. ग्रामसेवक गावात येऊन कधीच समस्या जाणून घेत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.