शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायदा अंमलबजावणीत महाराष्ट्र पहिले राज्य

By admin | Updated: January 18, 2016 00:55 IST

राज्यातील २ हजार ८४३ ग्राम पंचायतमधील सहा हजार गावांचा समावेश पेसा कायद्यांतर्गत होत असून पेसामधील सर्व ग्रामपंचायतीला विकास निधी पुरविण्यात आला आहे.

विष्णू सावरा : चिमूर येथे प्रकल्प अधिकारी व मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन चंद्रपूर : राज्यातील २ हजार ८४३ ग्राम पंचायतमधील सहा हजार गावांचा समावेश पेसा कायद्यांतर्गत होत असून पेसामधील सर्व ग्रामपंचायतीला विकास निधी पुरविण्यात आला आहे. त्यामुळेच पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले. प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विकासाच्या योजना गरजूपर्यंत प्रभाविपणे पोहचवाव्यात तसेच या वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींमधून प्रशासकीय सेवेतील अधिकारी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा ना. सावरा यांनी व्यक्त केली. चिमूर येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी व नगराध्यक्षा शिल्पा राचलवार उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून ना. सावरा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. १ कोटी २३ लाख रुपये खर्चून प्रकल्प कार्यालय तर २ कोटी ५० लाख रुपये खर्च करून आदिवासी मुलांचे वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालय व आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत होते. आदिवासी समाजातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहात राज्यात दरवर्षी ६० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. तर २५ हजार विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असतात. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. चिमूर प्रकल्पातील मागणी असलेल्या तिन्ही वसतिगृहाच्या बांधकामाला लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे ते म्हणाले. चिमूर येथील वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता ७५ असून वसतिगृहाच्या एक मजल्याच्या बांधकामासह विद्यार्थी क्षमता १५० करण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन ना. सावरा यांनी दिले.आदिवासी समाजातील तरुण तरुणींचा कल स्पर्धा परीक्षेकडे वाढला पाहिजे. आज मंत्रालयात एकही आदिवासी सचिव नाही, आयएएस अधिकारी नाही, अशी खंत व्यक्त करुन भारतीय प्रशासकीय सेवेतील आदिवासी टक्का वाढवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चिमूर प्रकल्प क्षेत्रातील वसतिगृह बांधकामास मंजुरी व विद्यार्थी क्षमता वाढवून देण्याची मागणी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी आपल्या भाषणातून केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)