शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

पेसा कायदा अंमलबजावणीत महाराष्ट्र पहिले राज्य

By admin | Updated: January 18, 2016 00:55 IST

राज्यातील २ हजार ८४३ ग्राम पंचायतमधील सहा हजार गावांचा समावेश पेसा कायद्यांतर्गत होत असून पेसामधील सर्व ग्रामपंचायतीला विकास निधी पुरविण्यात आला आहे.

विष्णू सावरा : चिमूर येथे प्रकल्प अधिकारी व मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन चंद्रपूर : राज्यातील २ हजार ८४३ ग्राम पंचायतमधील सहा हजार गावांचा समावेश पेसा कायद्यांतर्गत होत असून पेसामधील सर्व ग्रामपंचायतीला विकास निधी पुरविण्यात आला आहे. त्यामुळेच पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले. प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विकासाच्या योजना गरजूपर्यंत प्रभाविपणे पोहचवाव्यात तसेच या वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींमधून प्रशासकीय सेवेतील अधिकारी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा ना. सावरा यांनी व्यक्त केली. चिमूर येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी व नगराध्यक्षा शिल्पा राचलवार उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून ना. सावरा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. १ कोटी २३ लाख रुपये खर्चून प्रकल्प कार्यालय तर २ कोटी ५० लाख रुपये खर्च करून आदिवासी मुलांचे वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालय व आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत होते. आदिवासी समाजातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहात राज्यात दरवर्षी ६० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. तर २५ हजार विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असतात. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. चिमूर प्रकल्पातील मागणी असलेल्या तिन्ही वसतिगृहाच्या बांधकामाला लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे ते म्हणाले. चिमूर येथील वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता ७५ असून वसतिगृहाच्या एक मजल्याच्या बांधकामासह विद्यार्थी क्षमता १५० करण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन ना. सावरा यांनी दिले.आदिवासी समाजातील तरुण तरुणींचा कल स्पर्धा परीक्षेकडे वाढला पाहिजे. आज मंत्रालयात एकही आदिवासी सचिव नाही, आयएएस अधिकारी नाही, अशी खंत व्यक्त करुन भारतीय प्रशासकीय सेवेतील आदिवासी टक्का वाढवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चिमूर प्रकल्प क्षेत्रातील वसतिगृह बांधकामास मंजुरी व विद्यार्थी क्षमता वाढवून देण्याची मागणी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी आपल्या भाषणातून केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)