शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Maharashtra Election 2019 : विकासाच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी महायुतीला साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:07 IST

बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा मार्ग सुलभ करण्याचे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात विविध सामाजिक संघटनेतर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात आम्ही विकासाचा झंझावात निर्माण केला. बल्लारपूर शहरात सुसज्ज नाट्यगृह, पोलीस स्टेशन, डायमंड प्रशिक्षण केंद्र, शहरानजिक देशातील अत्याधुनिक सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्ड, स्टेडियम, ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम, शहरासाठी ६५ कोटी रू. किमतीची पाणीपुरवठा योजना, अशी विकासाची विविध कामे आपण बल्लारपूर शहरात मंजूर करविली आहे. बल्लारपूर शहरातील रेल्वे स्टेशन देखणे व सुंदर झाले असून देशातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी विकासाच्या बाजूने कौल देत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा मार्ग सुलभ करण्याचे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.बल्लारपूर शहरातील गणपती वार्डात विविध सामाजिक संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, मिना चौधरी, आशिष देवतळे, डॉ. बोनगीरवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, विकास प्रक्रियेत आम्ही कधीही राजकारण केले नाही.नेहमीच सर्वसमावेशक भूमिका आम्ही घेतली आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी असलेल्या योजनांचे अनुदान सहाशे रू. वरून वाढवून एक हजार रू. करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. बल्लारपूर शहरासाठी मोठया प्रमाणावर निधी आपण गेल्या पाच वर्षात उपलब्ध केला आहे. त्या माध्यमातून बल्लारपूर शहरात अभूतपूर्व अशी विकासकामे करण्यात आली आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा प्रयत्न आपण केला आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी बोलताना नगराध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले, विकास म्हणजे नेमके काय हे खऱ्या अर्थाने जनतेला कळले ते फक्त सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे. केवळ मतदार संघाच्या विकासाचा ध्यास ते उराशी बाळगतात. त्यांच्या पुढाकाराने आज चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाला आहे. विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी चंदनसिंह चंदेल यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन अमिता बोनगीरवार यांनी केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार