शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

Maharashtra Election 2019 ; येत्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्हा पाणीदार करणार - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर व सदाभाऊ खोत या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील सर्व २८८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे केले आहे. यावेळीही राज्यात महायुतीचे सरकार येईल, यात तीळमात्र शंका पडित व विचारवंतांच्या मनात नाही. महिला बचतगटाच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.

ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या ५० वर्षात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जेवढा निधी उपलब्ध झाला नाही, तेवढा निधी आम्ही या पाच वर्षाच्या काळात उपलब्ध केला. सिंचनाच्या क्षेत्रातसुध्दा या जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. पुढील पाच वर्षात हा जिल्हा पाणीदार व्हावा यादृष्टीने आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार आहोत, असा ग्वाही देतानाच या निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिंपाइं-रासप महायुतीचे जिल्ह्यातील सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर व सदाभाऊ खोत या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील सर्व २८८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे केले आहे. यावेळीही राज्यात महायुतीचे सरकार येईल, यात तीळमात्र शंका पडित व विचारवंतांच्या मनात नाही. महिला बचतगटाच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. हा जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर व्हावा यादृष्टीने आम्ही सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू, असे सांगत या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वासही भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.चंद्रपूर येथे शनिवारी भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, नाना श्यामकुळे, अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, रिपाईचे सिध्दार्थ पथाडे, जयप्रकाश कांबळे, सुरेश पचारे, डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ही निवडणूक विचारांची आहे, विकासाची आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तारूढ होईल, यात तिळमात्रही शंका नाही. गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यात विकासाची लक्षणीय कामे झाली. धानोरा, तेलवासा, आमडी या बॅरेजेसला मंजुरी मिळाली आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प पूर्ण झाला आहे.सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘आवाज दो’ योजनापुढील पाच वर्षात या जिल्ह्यातील १५ ही तालुके पाणीदार व्हावे, यासाठी बंधारे, कॅनल्सचे बांधकाम करण्याचे नियोजन आहे. रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पंतप्रधान आवास योजना या माध्यमातुन नागरिकांना घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. पुढील पाच वर्षात जिल्ह्यात एकही जण बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठे कॉटन क्लस्टंर उभारण्याचे आपले नियोजन आहे. पुढील पाच वर्षात आवाज दो ही योजना आपण सुरू करणार असून ज्या माध्यमातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचतील. प्रत्येक तालुक्यात स्टेडियमचे बांधकाम करण्यात येईल. मिशन शक्ती अंतर्गत सहा स्टेडियम बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. महाकाली मंदीर परिसर विकासासाठी ६५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक विकसित जिल्हा ठरावा, यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करू, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर