शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Apple Awe Dropping Event : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
3
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
6
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
7
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
8
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
9
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
10
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
11
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
12
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
13
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
14
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
15
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
16
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
17
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
18
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
19
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
20
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

महादेवाला जातानाचे रडणे आता थांबले

By admin | Updated: March 6, 2016 00:43 IST

मध्य प्रदेशातील पचमढी या शहरापासून सुमारे १५-२० किमी अंतरावरील सातपुडा पहाडावरच्या मोठा महादेवाचे विदर्भातील ...

वसंत खेडेकर बल्लारपूरमध्य प्रदेशातील पचमढी या शहरापासून सुमारे १५-२० किमी अंतरावरील सातपुडा पहाडावरच्या मोठा महादेवाचे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, वणी, बल्लारपूर, गोंडपिंपरी इत्यादी भागातील भगवान शंकराच्या भक्तांना मोठे आकर्षण ! दरवर्षी राखी पौर्णिमा, नामपंचमी आणि महाशिवरात्रीला येथून असंख्य भाविक गाड्या भरुन महादेव यात्रेला जात असतात. भाविकांचे मोठा महादेव हेआकर्षण गेल्या सात-आठ दशकापासून तर आजवर कायम आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. महादेव यात्रेला जाण्याकरिता पूर्वीहून आता कितीतरी सोयी झाल्या आहेत. रस्ते सुधारले, रहदारी साधनात वाढ झाली. पहाडी वाटेने, गंतव्य स्थळी जाण्याकरिता सोयीयुक्त पायऱ्या झाल्या. दोनही बाजूने कटघरे (रेलिंग) लावण्यात आल्या. ४०-५० वर्षांपूर्वी मात्र या प्रवासात तशा सुविधा नव्हत्या. भाविकांना रेल्वेने आणि त्यानंतर बराच प्रवास पायी करावा लागायचा. मध्य प्रदेशातील जुन्नारदेव हे रेल्वेचे या भागाकरिता जाण्यासाठी सोयीचे स्टेशन. त्यानंतर शंकराचे ठिकाण असलेल्या चौरागडला बरेच अंतर कापून पायी जावे लागायचे. रस्ता ओबडखाबड व कठीण असल्याने यात्रा पार करताना रस्त्यात मोठ्या अडचणी येत पहाडाच्या पायथ्याशी आल्यावर हिरवा या ठिकाणी आंघोळ व पूजा आटोपून पहाड चढणे सुरू व्हायचे. तीन मोठाले पहाड पार करीत मोठा महादेव स्थळ गाठावे लागते. पायथ्यापासून सुमारे तीन तासांचा १३०० पायऱ्या पार करण्याचा हा प्रवास म्हणजे कठीणच काम होते. त्याचे कारण, पूर्वी पायऱ्या सुरक्षित नव्हत्या आणि बाजूला सुरक्षित कठडे नव्हते. दोन्ही बाजूला मोठमोठ्या दरी आणि त्यातून हा मार्ग गाठणे एकंदरीत, महादेवाची यात्रा अवघड मानली जात होती. पायऱ्या पार करताना गर्दीच्या समयी धक्काबुक्कीत तोल जाऊन कुणी खाली पडला तर त्याचे जिवंत राहणे कठीणच! यामुळे महादेवाचे दर्शन घेण्याला गेलेला परत येईलच याची शाश्वती नाही, असे मानले जाई आणि म्हणून तशा काळी महादेव यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सार (निरोप) देण्याकरिता त्यांचे नातेवाईक वा परिचित दुरवरुन येत आणि घरुन निघताना हुदके देत रडत असत. जाणारे आणि निरोप देणारे दोघेही असे रडत आणि तोंडी हर हर महादेव... चा गरज व महादेवाचे गाणे असा प्रकार चालायचा.पोहा (मिरवणूक) ने भक्तांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविले जायचे. (अजूनही काही जण ‘पोहा’ने स्टेशनवर जातात.) पण आता काळ बदलला, साधने खूप झालीत. रेल्वेहून आणि कठीण मार्गाहून ट्रॅव्हल्स, सुमो या साधनांनी जाणे व झटपट यात्रा खूपच सोपी झाली आहे. महादेवाला गेलेला भक्त परत येणार की नाही, ही गोष्टच आता बाद झाली. आज सायंकाळला सुमोने घरुन निघा व परवा दुपारपर्यंत घरी सुखरुप व आरामाने परत या, यामुळे आता सार करताना कुणीच पूर्वीसारखे रडत नाहीत. उलट हसत हसत निरोप देतात आणि महादेवाची गाण म्हणतात... महादेवा येतो गा...माझ्या सांबाऽऽऽ