शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

लोअर वर्धाचे पाणी वर्धा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:09 IST

यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : बल्लारपूरची पाणी समस्या तात्पूरर्ती दूर

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तद्वतच पेपरमीलकडून पाणी घ्यावे लागत होते. परंतु लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दोन फुटाहून अधिक वाढली आहे.या उपाययोनेमुळे जीवन प्राधिकरणाच्या विहिरीला मुबलक पाणी पुरवठा होऊ लागल्याने शहरात पेयजलाची उद्भवलेली समस्या तुर्तास दूर झाली आहे. आता नळाद्वारे दररोज पाणी मिळणार आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने या उन्हाळ्यात वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही.त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवू लागला. ही स्थिती बिकट होण्याची शक्यता दिसत असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडण्यात यावे, अशी मागणी केली. आर्वीतील लोअर वर्धा धरणाचे ३२ एम.एम. क्युब मीटर पाणी वर्धा नदीत २०-२५ दिवसांपूर्वी सोडण्यात आले. ते पाणी तब्बल २२ दिवसांनी म्हणजे रविवारला दुपारला येथे येवून पोहचले आहे. त्यामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दोन अडीच फुटाने वाढली आहे. त्यामुळे येणाºया मान्सूनपर्यंत येथील पाणी पुरवठा पूर्वीप्र्रमाणे दररोज सुरू राहील, अशी माहिती मप्रजाचे विभागीय अभियंता यांनी दिली. मान्सून नियोजित वेळेवर न येता काहीसा लांबला तरी पाणी पुरेल, अशी स्थिती आहे.लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडल्याने येथील पाणी पुरवठा जरी दररोज केला जाणार असला तरी नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी.- सुशील पाटील,विभागीय अभियंता, बल्लारपूर.