शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

लोअर वर्धाचे पाणी वर्धा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:09 IST

यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : बल्लारपूरची पाणी समस्या तात्पूरर्ती दूर

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तद्वतच पेपरमीलकडून पाणी घ्यावे लागत होते. परंतु लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दोन फुटाहून अधिक वाढली आहे.या उपाययोनेमुळे जीवन प्राधिकरणाच्या विहिरीला मुबलक पाणी पुरवठा होऊ लागल्याने शहरात पेयजलाची उद्भवलेली समस्या तुर्तास दूर झाली आहे. आता नळाद्वारे दररोज पाणी मिळणार आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने या उन्हाळ्यात वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही.त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवू लागला. ही स्थिती बिकट होण्याची शक्यता दिसत असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडण्यात यावे, अशी मागणी केली. आर्वीतील लोअर वर्धा धरणाचे ३२ एम.एम. क्युब मीटर पाणी वर्धा नदीत २०-२५ दिवसांपूर्वी सोडण्यात आले. ते पाणी तब्बल २२ दिवसांनी म्हणजे रविवारला दुपारला येथे येवून पोहचले आहे. त्यामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दोन अडीच फुटाने वाढली आहे. त्यामुळे येणाºया मान्सूनपर्यंत येथील पाणी पुरवठा पूर्वीप्र्रमाणे दररोज सुरू राहील, अशी माहिती मप्रजाचे विभागीय अभियंता यांनी दिली. मान्सून नियोजित वेळेवर न येता काहीसा लांबला तरी पाणी पुरेल, अशी स्थिती आहे.लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडल्याने येथील पाणी पुरवठा जरी दररोज केला जाणार असला तरी नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी.- सुशील पाटील,विभागीय अभियंता, बल्लारपूर.