शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लोअर वर्धाचे पाणी वर्धा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:09 IST

यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : बल्लारपूरची पाणी समस्या तात्पूरर्ती दूर

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : यंदा कमी झालेला पाऊस व कडक उन्हामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. बल्लारपूर शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दिल्या जाणाऱ्या नियमित पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. तद्वतच पेपरमीलकडून पाणी घ्यावे लागत होते. परंतु लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दोन फुटाहून अधिक वाढली आहे.या उपाययोनेमुळे जीवन प्राधिकरणाच्या विहिरीला मुबलक पाणी पुरवठा होऊ लागल्याने शहरात पेयजलाची उद्भवलेली समस्या तुर्तास दूर झाली आहे. आता नळाद्वारे दररोज पाणी मिळणार आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने या उन्हाळ्यात वर्धा नदीत पुरेसे पाणी जमा झाले नाही.त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवू लागला. ही स्थिती बिकट होण्याची शक्यता दिसत असल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडण्यात यावे, अशी मागणी केली. आर्वीतील लोअर वर्धा धरणाचे ३२ एम.एम. क्युब मीटर पाणी वर्धा नदीत २०-२५ दिवसांपूर्वी सोडण्यात आले. ते पाणी तब्बल २२ दिवसांनी म्हणजे रविवारला दुपारला येथे येवून पोहचले आहे. त्यामुळे येथील वर्धा नदीच्या पाण्याची पातळी दोन अडीच फुटाने वाढली आहे. त्यामुळे येणाºया मान्सूनपर्यंत येथील पाणी पुरवठा पूर्वीप्र्रमाणे दररोज सुरू राहील, अशी माहिती मप्रजाचे विभागीय अभियंता यांनी दिली. मान्सून नियोजित वेळेवर न येता काहीसा लांबला तरी पाणी पुरेल, अशी स्थिती आहे.लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडल्याने येथील पाणी पुरवठा जरी दररोज केला जाणार असला तरी नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी.- सुशील पाटील,विभागीय अभियंता, बल्लारपूर.