शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयाला ‘खो’ अडचणींचे

By admin | Updated: October 3, 2015 00:55 IST

नागभीडच्या विकासाला जी अनेक कारणे मारक ठरत आहेत, त्यापैकी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाला खो हे एक प्रमुख कारण आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : नागभीड तालुक्यातील नागरिक त्रस्तघनश्याम नवघडे नागभीडनागभीडच्या विकासाला जी अनेक कारणे मारक ठरत आहेत, त्यापैकी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाला खो हे एक प्रमुख कारण आहे. पण कोणताच लोकप्रतिनिधी यासंदर्भात आवाज उठवत नसल्याने या अधिकारी कर्मचाऱ्यांंचे चांगलेच फावत आहे. पण या प्रकाराने नागभीडची अर्थव्यवस्था दिसेंदिवस खिळखिळी होत असून याचे भान मात्र कोणालाही नाही.तालुक्याचे मुख्यालय म्हणून या ठिकाणी अनेक कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालय आहेत. हे कार्यालय आणि शाळा-महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर ती हजारोंच्या घरात जाते. पण यातील किती अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि प्राध्यापक नागभीडमध्ये वास्तव्याला राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. शेकडा ७० टक्के अधिकारी व अन्य कर्मचारी हे नागभीड येथे राहतच नाही. हे निर्विवाद सत्य आहे. हेच अधिकारी आणि कर्मचारी नागभीड येथे वास्तव्याने राहिले असते तर येथील प्रत्येक व्यवसायाला बळकटी मिळाली असती. येथील किराणा, कापड, औषधी, हॉटेल हेच नाही तर येथील प्रत्येक व्यवसाय फोफावला असता. घरांची मागणी वाढली असती. पण हे अधिकारी कर्मचारी येथे राहतच नसल्याने या केवळ बाता ठरल्या आहेत. मुख्यालयाचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतो, तेव्हा केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाच टार्गेट केले जाते. पण या व्यतिरिक्त अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे काय, काही अंशी नागभीडचा विकास साधायचा असेल तर या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा मुख्यालयात राहण्यासंदर्भात विचार व्हायला पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला पाहिजे.येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, कृषी विभागाचेच उपविभागीय कार्यालय, सां.बा. विभागाचे उपविभागीय कार्यालय, सिंंचाई, विद्युत, विभागाचे उपविभागीय कार्यालय, पशुवैद्यकीय विभागा, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, गो.वा. महाविद्ययालय, शिक्षण विभाग अशी अनेक विभागांची यादी या ठिकाणी देता येईल. यातील केवळ बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारीच नागभीड येथे वास्तव्याने आहेत. शेकडा ७० टक्के कर्मचारी एकतर ब्रह्मपुरी येथे राहतात. नाही तर नागपूर- चंद्रपूर येथून अपडाऊन करतात. येथील कित्येकांनी तर ब्रह्मपुरीत टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत.