शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

मुख्यालयाला ‘खो’ अडचणींचे

By admin | Updated: October 3, 2015 00:55 IST

नागभीडच्या विकासाला जी अनेक कारणे मारक ठरत आहेत, त्यापैकी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाला खो हे एक प्रमुख कारण आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : नागभीड तालुक्यातील नागरिक त्रस्तघनश्याम नवघडे नागभीडनागभीडच्या विकासाला जी अनेक कारणे मारक ठरत आहेत, त्यापैकी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाला खो हे एक प्रमुख कारण आहे. पण कोणताच लोकप्रतिनिधी यासंदर्भात आवाज उठवत नसल्याने या अधिकारी कर्मचाऱ्यांंचे चांगलेच फावत आहे. पण या प्रकाराने नागभीडची अर्थव्यवस्था दिसेंदिवस खिळखिळी होत असून याचे भान मात्र कोणालाही नाही.तालुक्याचे मुख्यालय म्हणून या ठिकाणी अनेक कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत. शाळा, महाविद्यालय आहेत. हे कार्यालय आणि शाळा-महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर ती हजारोंच्या घरात जाते. पण यातील किती अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि प्राध्यापक नागभीडमध्ये वास्तव्याला राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. शेकडा ७० टक्के अधिकारी व अन्य कर्मचारी हे नागभीड येथे राहतच नाही. हे निर्विवाद सत्य आहे. हेच अधिकारी आणि कर्मचारी नागभीड येथे वास्तव्याने राहिले असते तर येथील प्रत्येक व्यवसायाला बळकटी मिळाली असती. येथील किराणा, कापड, औषधी, हॉटेल हेच नाही तर येथील प्रत्येक व्यवसाय फोफावला असता. घरांची मागणी वाढली असती. पण हे अधिकारी कर्मचारी येथे राहतच नसल्याने या केवळ बाता ठरल्या आहेत. मुख्यालयाचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतो, तेव्हा केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाच टार्गेट केले जाते. पण या व्यतिरिक्त अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे काय, काही अंशी नागभीडचा विकास साधायचा असेल तर या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा मुख्यालयात राहण्यासंदर्भात विचार व्हायला पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला पाहिजे.येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, कृषी विभागाचेच उपविभागीय कार्यालय, सां.बा. विभागाचे उपविभागीय कार्यालय, सिंंचाई, विद्युत, विभागाचे उपविभागीय कार्यालय, पशुवैद्यकीय विभागा, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, गो.वा. महाविद्ययालय, शिक्षण विभाग अशी अनेक विभागांची यादी या ठिकाणी देता येईल. यातील केवळ बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारीच नागभीड येथे वास्तव्याने आहेत. शेकडा ७० टक्के कर्मचारी एकतर ब्रह्मपुरी येथे राहतात. नाही तर नागपूर- चंद्रपूर येथून अपडाऊन करतात. येथील कित्येकांनी तर ब्रह्मपुरीत टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत.