शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

दादासाहेबांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची हानी

By admin | Updated: July 26, 2015 01:28 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक तथा केरळचे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांची शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली.

चंद्रपूर: रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक तथा केरळचे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांची शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरातून दुखवटा व्यक्त होत असताना, चंद्रपूर जिल्ह्यातूनही त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सामान्य कार्यकर्ता ते केरळचे राज्यपाल अशा दादासाहेबांच्या राजकीय प्रवासाचे प्रत्यक्ष साक्षिदार असलेले येथील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम यांनी आठवणींचा पट उलगडला. ते म्हणाले, दादासाहेब हे दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. १९६४ मध्ये दादासाहेबांच्या नेतृत्वात भूमिहिनांचा लढा उभारण्यात आला होता. या लढ्याची यशस्वी सांगता अमरावतीमध्ये झाली. असा नेत्रदीपक सोहळा मी आयुष्यात कधीच पाहिला नाही. त्यावरून दादासाहेबांचा लोकानुनय किती मोठा होता, याची कल्पना येते. १० वर्षांपूर्वी चंद्रपुरात त्यांचा सत्कार करण्यात आला. या माणसाने निव्वळ आश्वासने दिली नाहीत. लोकांचे प्रश्न सोडवत ते पुढे गेले. पक्षासाठी त्यांनी कष्ट उपसले. चंद्रपूर विविध कारणांनी त्यांचे अनेकवेळा येणे झाले. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून सतत सामाजिक तळमळ जाणवत असायची. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. तेव्हा त्यांच्या पत्नी कमलाताई यांनी प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे मला सांगितले. मात्र आज अचानक त्यांच्या निधनाची बातमीच येथे येऊन धडकली आणि धक्काच बसला, असे ते म्हणाले.सावली माझा राजकीय बालेकिल्लासावली गावावर दिवंगत रा.सू. गवई यांचे नितांत प्रेम होते. सावली गाव माझा राजकीय बालेकिल्ला असल्याचे ते प्रत्येक वेळच्या भाषणातून आवर्जुन सांगत. त्या काळातील येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते प्रल्हाद गेडाम, डॉ.वाय.टी.गेडाम, राघोबा गोंगले हे त्यांच्या सुरुवातीच्या कालखंडातील खंदे समर्थक होते. कालांतराने परिस्थिती बदलली आणि स्थित्यंतरे आली. मात्र दिवंगत रा.सू. गवई यांना या परिसरात येण्याचा प्रसंग येत होता त्यावेळी त्यांनी सावली येथे आवर्जुन भेट दिली आहे. १९८८ मध्ये उसळलेल दंगलीच्यावेळी त्यांनी सावली येथे येऊन सर्व पक्षीय बैठक बोलविली. त्यात सामाजिक वातावरण दूषित होऊ नये, सलोखा कायम राहावा, यासाठी सर्वांची समजूत काढली. सावली विधानसभा क्षेत्र कायम राहावे, यासाठी स्थानिक कृती समितीला सहकार्य केले. परंतु त्यांना यश आले नाही. आंबेडकरी विचारधारेचे तात्कालिन खासदार जोगेंद्रनाथ मंडल व हरिहरराव सोनुने यांच्या समवेतही त्यांनी गावाला भेट दिली. केरळ आणि बिहारचे राज्यपाल असताना दोन्हीवेळा त्यांनी सावलीला भेट दिली. केरळचे राज्यपाल असताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया सावलीच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिवंगत रा.सू. गवई यांच्या हस्ते तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला.