शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेबांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची हानी

By admin | Updated: July 26, 2015 01:28 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक तथा केरळचे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांची शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली.

चंद्रपूर: रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक तथा केरळचे माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांची शनिवारी दुपारी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरातून दुखवटा व्यक्त होत असताना, चंद्रपूर जिल्ह्यातूनही त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सामान्य कार्यकर्ता ते केरळचे राज्यपाल अशा दादासाहेबांच्या राजकीय प्रवासाचे प्रत्यक्ष साक्षिदार असलेले येथील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. मेश्राम यांनी आठवणींचा पट उलगडला. ते म्हणाले, दादासाहेब हे दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. १९६४ मध्ये दादासाहेबांच्या नेतृत्वात भूमिहिनांचा लढा उभारण्यात आला होता. या लढ्याची यशस्वी सांगता अमरावतीमध्ये झाली. असा नेत्रदीपक सोहळा मी आयुष्यात कधीच पाहिला नाही. त्यावरून दादासाहेबांचा लोकानुनय किती मोठा होता, याची कल्पना येते. १० वर्षांपूर्वी चंद्रपुरात त्यांचा सत्कार करण्यात आला. या माणसाने निव्वळ आश्वासने दिली नाहीत. लोकांचे प्रश्न सोडवत ते पुढे गेले. पक्षासाठी त्यांनी कष्ट उपसले. चंद्रपूर विविध कारणांनी त्यांचे अनेकवेळा येणे झाले. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून सतत सामाजिक तळमळ जाणवत असायची. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. तेव्हा त्यांच्या पत्नी कमलाताई यांनी प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे मला सांगितले. मात्र आज अचानक त्यांच्या निधनाची बातमीच येथे येऊन धडकली आणि धक्काच बसला, असे ते म्हणाले.सावली माझा राजकीय बालेकिल्लासावली गावावर दिवंगत रा.सू. गवई यांचे नितांत प्रेम होते. सावली गाव माझा राजकीय बालेकिल्ला असल्याचे ते प्रत्येक वेळच्या भाषणातून आवर्जुन सांगत. त्या काळातील येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते प्रल्हाद गेडाम, डॉ.वाय.टी.गेडाम, राघोबा गोंगले हे त्यांच्या सुरुवातीच्या कालखंडातील खंदे समर्थक होते. कालांतराने परिस्थिती बदलली आणि स्थित्यंतरे आली. मात्र दिवंगत रा.सू. गवई यांना या परिसरात येण्याचा प्रसंग येत होता त्यावेळी त्यांनी सावली येथे आवर्जुन भेट दिली आहे. १९८८ मध्ये उसळलेल दंगलीच्यावेळी त्यांनी सावली येथे येऊन सर्व पक्षीय बैठक बोलविली. त्यात सामाजिक वातावरण दूषित होऊ नये, सलोखा कायम राहावा, यासाठी सर्वांची समजूत काढली. सावली विधानसभा क्षेत्र कायम राहावे, यासाठी स्थानिक कृती समितीला सहकार्य केले. परंतु त्यांना यश आले नाही. आंबेडकरी विचारधारेचे तात्कालिन खासदार जोगेंद्रनाथ मंडल व हरिहरराव सोनुने यांच्या समवेतही त्यांनी गावाला भेट दिली. केरळ आणि बिहारचे राज्यपाल असताना दोन्हीवेळा त्यांनी सावलीला भेट दिली. केरळचे राज्यपाल असताना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया सावलीच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिवंगत रा.सू. गवई यांच्या हस्ते तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला.