शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले

By admin | Updated: January 28, 2016 00:51 IST

तालुक्यातील बेंबाळ येथील ग्रामपंचायत कमेटी व ग्रामविस्तार अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे गावात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.

बेंबाळ येथील घटना : विविध मूलभूत समस्यांनी जनता त्रस्तमूल : तालुक्यातील बेंबाळ येथील ग्रामपंचायत कमेटी व ग्रामविस्तार अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे गावात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला. शेकडो गावकऱ्यांनी पंचायत समिती मूल येथील कार्यालयात येऊन गावातील समस्या सोडवा व ग्रामविस्तार अधिकारी मेश्राम यांची बदली करण्याची मागणी करीत जोरदार घोषणा दिल्या व प्रजासत्ताक दिनीच ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. दरम्यान, संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून वरिष्ठांना मार्गदर्शन मागितले आहे.तालुक्यातील बेंबाळ येथील जनतेने संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान ग्रामपंचायत कमेटी व ग्रामविस्तार अधिकारी हेतुपुरस्सर जनतेच्या समस्या जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी, पथदिवे, नाली उपसा, अशा विविध मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करीत असून कमेटीच्या हिताचे विषय सभेत ठेऊन ते पारित करण्याचे षडयंत्र अंमलात आणीत आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या भोंगळ कारभाराची माहिती शासनाला वारंवार देऊनसुद्धा कुठलाही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.शासनाकडून मिळालेला निधी परस्पर उचल करुन नंतर कमी दर्जाचे काम करणे वा न करणे, खोटी देयके सादर करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन न देणे, मजुरांची कामाची रक्कम न देणे, शौचालय लाभार्थी देयके न देणे, दलित वस्ती सुधार निधीचा दुरुपयोग करणे आदी प्रकार सुरू आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थ विद्यमान कमेटीला विषय मांडण्यास विनंती केली असता कमेटी व ग्रामविस्तार अधिकारी आमच्या विनंतीला प्रतिसाद न देता जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे त्रस्त जनतेनी प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून समस्या निकाली काढण्यासाठी पंचायत समिती मूलला निवेदन सादर केले.यावेळी शेकडो महिला व पुरुषांनी हजेरी लावून न्याय मागण्यासाठी विविध घोषणा दिल्या. संवर्ग विकास अधिकारी प्रदीप पांढरबडे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांच्याकडून सूचना आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)