शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

स्थानिक सुट्ट्यांना शिक्षण विभागाची कात्री

By admin | Updated: August 3, 2014 23:17 IST

जिल्हा परिषद शाळांच्या स्थानिक सुट्ट्यांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग मंजुरी देते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या स्थानिक सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत.

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरजिल्हा परिषद शाळांच्या स्थानिक सुट्ट्यांना जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग मंजुरी देते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या स्थानिक सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोळा, तान्हा पोळा, हरितालिका तसेच अन्य सणांच्या दिवशीही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे.ग्रामीण व शहरी भागातही सणांच्या दिवशी विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची मानसिकता नसते. परिणामी शाळा सुरु असूनही विद्यार्थी शाळेकडे पाठ फिरवितात. त्यामुळे वर्गात गुरुजी आणि घरी विद्यार्थी असा प्रकार अनेकदा घडतो.मागील वर्षीच्या तुलनेत स्थानिक सुट्या यावर्षी प्रशासनाने कमी केल्या आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यात या सुट्यांना मंजुरी दिली आहे. परंतु चंद्रपूर प्रशासनाला या सणांच्या सुट्यांची अ‍ॅलर्जी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा ग्रामीण भागात आहे. पोळा हा सण ग्रामीण भागात महत्त्वाचा आहे. ग्रामीण नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे पोळ्याच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. मात्र शिक्षण विभागाने याच दिवशी शाळा सुरु ठेवण्याचे आदेश दिल्याने विद्यार्थ्यांचा आनंदावर विरजण पडणार आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी लहान बालके नंदीबैलाची पूजा करतात. त्यानंतर गावातून फेरी काढतात. मात्र या दिवशीसुद्धा शाळा सुरु राहणार असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.रक्षाबंधनाचीसुद्धा यावर्षी प्रशासनाने सुटी रद्द केली आहे. मात्र या दिवशी रविवार आल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.भारतातील कृषी व्यवसाय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये शेती व्यवसायाकडे दुय्यम नजरेने बघितले जाते. शेती व्यवसायाकडे युवकांनी वळावे यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहे. मात्र पोळ्यासारख्या सणाची सुटी रद्द केल्याने विद्यार्थ्यांना शेती आणि बैलांचे महत्त्व कसे कळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने विविध पाऊले उचलले असले तरी, विद्यार्थ्यांना संस्कृती माहित होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेता दरवर्षी मुख्याध्यापकाच्या अधिकारातील दोन सुट््या दिल्या जात होत्या. त्याही सुट्या यावर्षीपासून रद्द करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात संस्कृतीनुसार काही कार्यक्रम, सण-वार साजरे केले जाते. त्या दिवशी विद्यार्थी शाळेला बुट्टी मारतात. अशावेळी मुख्याध्यापकाच्या अधिकारातील सुटी महत्त्वाची असते. मात्र ती सुटीसुद्धा रद्द करण्यात आली आहे. यामुळे एखाद्या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत उपस्थित नसले तरीही शिक्षकांना मात्र पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे.