शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मूल नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले

By admin | Updated: April 22, 2016 02:58 IST

मूल नगर परिषदेची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेसने

मूल : मूल नगर परिषदेची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेसने उमेदवारांची चाचपणीदेखील सुरू केली आहे. विद्यमान पदाधिकारी, नगरसेवक व नव्याने बांशिग बांधू पाहणाऱ्यांनी पक्षाची तिकीट मिळावी, यासाठी प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव लक्षात घेता, भाजपा सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसून येते. विद्यमान काही पदाधिकाऱ्यांना भाजपा डच्चू देणार असुन काँग्रेसने देखील उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे दिसून येते. एकंदरीत मूल नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्याचे दिसुन येते.मूल नगर परिषदेवर भाजपाची सत्ता असुन भाजपाचे १३ नगरसेवक आहेत. भाजपाचे स्पष्ट बहुमत असतानोसुद्धा एखादा लोकोपयोगी ठराव करायला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे भाजपाचे स्पष्ट बहुमत असतानासुद्धा ठराव नामंजुर होण्याची पाळी देखील बहुतेकवेळा आल्याचे दिसुन येते. त्यामुळे स्पष्ट बहुमत असताना देखील ठराव मंजूर होणार की नाही याची धास्ती भाजपाच्या पदाधिकारी व नेत्यांत वेळोवेळी होताना दिसते. परिणामी गेली साडेचार वर्षे क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी पदाधिकारी व नगरसेवकांना विशेष बैठक बोलावून समजसुद्धा दिली आहे. विकासाच्या मुद्यावर एकमत होण्याविषयी वारंवार सांगितल्यानंतरही नगरपालिकेच्या सभागृहात जे व्हायचे तेच झाले. सभागृहात काही पदाधिकारी चर्चा करतात तर काही गप्प बसणे सोईचे समजतात. यावरून एकवाक्यता होत नसल्याने स्पष्ट बहुमत असतानादेखील पराभवाची एकप्रकारे ‘चाहुल’च लागल्याचे बोलल्या जाते. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहर विकासासाठी भरीव योगदान दिले आहे, हे कुणीही विसरू शकणार नाही. मूल शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा त्यांचा ध्यास आहे. नियोजनबद्ध आखणी केली तर निधीची कमतरता भासू देणार नाही हे त्यांनी वारंवार सांगितले. मात्र मूल नगरपरिषदेच्या सत्तारूढ पदाधिकाऱ्यांत नियोजनाचा अभाव पदोपदी जाणवतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर या क्षेत्राला भरीव योगदान देऊ शकतात. त्यासाठी दूरदृष्टीकोन असायला पाहिजे. मात्र ती दृष्टीच नसल्याचे जाणवते. त्यामुळे मूल शहराच्या विकासाला भरीव योगदान देणारे असले तरी त्याचे नियोजन करणारे नसतील तर काय कामाचे? हिच स्थिती सध्या मूल शहरात दिसत आहे. पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात वाढत चाललेली दरी बघता याचा कायदा विरोधी असलेल्या काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसुन येते. नगर परिषदेत भाजपाविरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत असली तर ज्यांना पक्षाची तिकीट मिळणार नाही, ते अपक्ष राहिल्यास कुठे तिरंगी लढत झाल्याचेही आजपर्यंत बघितले आहे. मूल नगर परिषदेवर यापुर्वी काँग्रेसचा दबदबा होता. मात्र मागील निवडणुकीत क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे प्रतिनिधीत्व करीत असल्याने मूल शहराचा विकास साधला जाईल यासाठी लोकांनी उमेदवारांकडे जास्त लक्ष न घालता मुनगंटीवार यांच्याकडे बघूनच मतदान केल्याचे दिसून येते. यावेळी ते राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. विकासाचा मुद्दा काँग्रेस पक्ष किती प्रमाणात उचलून धरून आपली बाजु मांडतात व उमेदवार कसा देतात? यावरच कॉंग्रेसचे भवितव्य ठरणार आहे. यावेळी भाजपा व काँग्रेस योग्य उमेदवारांची चाचपणी करून रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे निवडणुकीला ५ महिन्यांचा कालावधी असला तरी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)