शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

कर्ज प्रकरणे मंजूर मात्र निधी नाही!

By admin | Updated: September 20, 2014 01:35 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

नागरिकांची कार्यालयाकडे धाव : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत १०६ प्रकरणे मंजूरदिलीप दहेलकर ल्ल गडचिरोलीलोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत १०६ कर्ज प्रकरणे १४ आॅगस्ट २०१४ रोजी महामंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयाकडून मंजूर करण्यात आले. मात्र राज्य शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे जिल्ह्यातील चांभार समाजाचे नागरिक व्यवसायापासून वंचित राहिले आहेत. शुक्रवारी अनेक चांभार बांधवांनी कर्जाकरिता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र कर्ज मिळत नसल्याने रोष व्यक्त केला.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत लघु उद्योगासाठी दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या १२ पोट जातीतील नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील चांभार समाजातील नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले. जिल्ह्यात जवळपास १३६ नागरिकांनी कर्ज योजनेकरीता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज सादर केले. या कार्यालयाने सदर कर्जाचे प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे पाठविले. या प्रस्तावाची छाणणी करून मुख्य कार्यालयाने १०६ नागरिकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली. मंजूर झालेल्या नागरिकांना लघु व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रूपये कर्ज वितरित करण्यात येणार आहे. कर्ज मिळणार असल्याच्या आशेवर जिल्ह्यात अनेक चांभार बांधव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात येऊन वारंवार विचारणा करतात. मात्र निधी उपलब्ध झाली नसल्याची माहिती मिळताच परत जातात. गेल्या महिनाभरापासून चांभार समाज बांधव कर्जासाठी वारंवार या कार्यालयाकडे चकरा मारीत असल्याचे दिसून येते. शासनाचे कर्ज उपलब्ध झाल्यास छोटासा उद्योग सुरू करण्याचा माणस अनेक समाज बांधवांनी बाळगला आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे या समाज बांधवांच्या स्वप्नावर पाणी फेरत असल्याचे दिसून येते. केवळ चार टक्के अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची ही महामंडळाची योजना आहे. या समाजातील नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती असल्यामुळे हे नागरिक अन्य बँकांकडून कर्ज घेऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरचजिल्ह्यातील चांभार समाजासह अन्य दारिद्र्य रेषेखालील १२ पोटजातीतील नागरिकांना कर्ज उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावे या हेतूने राज्य शासनाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. वर्षभरापूर्वी या महामंडळाचे जिल्हा कार्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीत सुरू करण्यात आले. मात्र या महामंडळाच्या कार्यालयाला स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नाही. चंद्रपूरच्या जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस गडचिरोली येथे येऊन या कार्यालयाचा कारभार सांभाळतात. अनेकदा या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिक निराश होऊन परत जातात. शासनाने कार्यालय सुरू केले मात्र या कार्यालयात स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. यामुळे या कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे.