शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे भारनियमनाचे नवे संकट

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरोरा- भद्रावती उपविभागीय कार्यक्षेत्राअंतर्गत ग्रामीण भागात भारनियमन करण्यात येत आहे.

शेती सिंचन कसे होणार ?: लोकप्रतिनिधींचीही उदासीनतामाजरी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरोरा- भद्रावती उपविभागीय कार्यक्षेत्राअंतर्गत ग्रामीण भागात भारनियमन करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत सुरु असणारे भारनियमन बंद करावे, अशी ग्रामीण भागातून केली जात आहे.पावसाळा असूनही वरूणराजाची कृपा होत नाही आणि सरकारी स्तरावर कृत्रिम पाऊसाची व्यवस्था केली जात नाही. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच आता वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केल्याने आणखी परिस्थिती बिघडली आहे. पाऊस नसल्याने आणि विद्युत भारनियमन मोठ्या प्रमाणात असल्याने शेती सिंचन कसे होणार, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.एकीकडे सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला तर दुसरीकडे सरकारी भारनियमनाचे धोरण आडवे आले. यात बळीराजा भरडला जात असल्याची सर्वत्र ओरड ऐकविण्यात येते. या ग्रामीण परिसरात अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था असून केवळ वीज भारनियमनामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.वातानुकूलित हवेत कार्यालयात बसून काम पाहणारे विद्युत अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी भारनियमन बंद करण्याची वेळावेळी मागणी केली. मात्र कोणताही उपयोग झाला नाही. लोकप्रतिनिधींनाही भारनियमन व शेती सिंचनाची अडचण सांगण्यात आली. त्यांच्याकडे बळीराजासाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे अधिकाऱ्यांची मनमर्जी सुरु असल्याचा परिसरातील ग्रामस्थांचा आरोप आहे.निवडणुकीच्या काळात मोठमोठ्या आश्वासनाची खैरात करणारे पुढारी- नेते व लोकप्रतिनिधी यांचासुद्धा ग्रामीण क्षेत्रातील भारनियमनाकडे कानडोळा होत असल्याची सर्वत्र ओरड सुरू आहे. मागील वर्षी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत राजकीय पुढारी, उमेदवार व सर्वच प्रचार करणारे, शेती आणि शेतकरी यांच्या हिताची भाषा बोलत होते. मात्र आता शेतकरीवर्ग संकटात सापडला असताना भारनियमन बंद होण्यासाठी कुणीच पावलं उचलायला तयार नाहीत. भद्रावती तालुक्यात एकही सिंचन प्रकल्प नाही. याचेही कुणालाच सोयरसुतक दिसून येत नाही. निवडणुकीदरम्यान व पुढे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ग्रामीण भागासाठी अच्छे दिन येणार, असे सर्वत्र बोलले जात होते. मात्र तसे काहीच झाले नसून पूर्वीसारखेच आणि त्यापेक्षा वाईट दिवस शेतकऱ्यांचे आले आहे. तरीही शासन काहीही करताना दिसत नाही, हे आणखी एक शेतकऱ्यांचे दुर्दैव. (वार्ताहर)