शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

साहित्य निर्मिती सकस हवी; उचलेगिरीला भविष्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. निर्मला पाटील, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. संजीव कोंडेकर यांच्या संकल्पनेतून ही मुलाखत घेण्यात आली. साहित्य ...

साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. निर्मला पाटील, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. संजीव कोंडेकर यांच्या संकल्पनेतून ही मुलाखत घेण्यात आली. साहित्य परिषद गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संतोष डाखरे व संजय गोडे यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीतून थुटे गुरुजींचा साहित्यिक प्रवास श्रोत्यांसाठी उलगडला. सहजता व साधेपणा हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभावगुण असतो. परंतु प्रसिद्धी व प्रतिष्ठा यामुळे अहंकार उसळी मारत असतो. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. आपल्या विरोधी लोकांबाबतही असुया नसावी. तेव्हाच सहजता ही स्वभावातील सवय बनते, याकडेही ना. गो. थुटे यांनी लक्ष वेधले. आयुष्याचा अभिलेख हे आत्मकथन म्हणजे मी कसा जगलो व वागलो याचे प्रांजळ रेकॉर्ड आहे. शिक्षकी पेशात असताना विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण प्रयोग केले. शैक्षणिक व अन्य साहित्यिक कामाचा लेखाजोखा म्हणजे आयुष्याचा अभिलेख होय, अशी भूमिका थुटे यांनी मांडली.

मुलाखतीसाठी विभागीय अध्यक्ष पुष्पा बोंडे यांनी पुढाकार घेतला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संजय कालर यांचेही सहकार्य लाभले.

आपण आपली रेषा मोठी करावी

आयुष्यावर संत तुकोबाराय आणि साने गुरुजींचा प्रभाव असल्याचे ना. गो. थुटे यांनी सांगितले. या महापुरुषांच्या जीवनातील सत्याची मांडणी व दीनदुःखितांची निरपेक्ष सेवा मनाला भावली. बहुजन समाजात अलीकडे अस्मिता निर्माण झाल्या आहेत. परंतु प्रतिभा असूनही त्यांना मुख्य प्रवाहात प्लॅटफॉर्म मिळत नाही. मात्र, आपण आपली रेषा मोठी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

विचारवंतांचे मौन जास्त धोकादायक

शेतकरी, बेरोजगारी, महागाई, सामाजिक विद्वेष व शासनाची भूमिका यावर भाष्य करताना ना. गो. थुटे म्हणाले, ‘सध्या जे काही देशात चाललेय, ते चिंताजनक आहे. परंतु यावर देशातील प्रस्थापित बहुसंख्य साहित्यिक व विचारवंतांनी मौन बाळगणे जास्त धोकादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

४५ ग्रंथांमधून मांडला जीवनानुभव

ना. गो. थुटे यांनी वयाची ८२ वर्षे नुकतीच पूर्ण केली. ‘आयुष्याचा अभिलेख’ हे आत्मकथन अलीकडेच प्रकाशित झाले आहे. ‘गीते स्वागते’ या पहिल्या कवितासंग्रहापासून सुरू झालेल्या साहित्यिक प्रवासात त्यांनी ४५ पुस्तके लिहिली. त्यामध्ये ११ समीक्षाग्रंथ आहेत. दोन अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यावर आचार्य पदवी मिळविली. महाराष्ट्र शासनाने १९८६ मध्ये त्यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला आहे.

.............