शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लिंक फेलचा भुर्दंड अभिकर्त्यांवर !

By admin | Updated: October 1, 2015 01:22 IST

देशातील सर्व डाक कार्यालये संगणकीकृत होत असल्याने येथील कामेही आता आॅनलाईन होत आहेत.

तांत्रिक अडचणींचा फटका : डाक कार्यालयातील प्रकारसास्ती : देशातील सर्व डाक कार्यालये संगणकीकृत होत असल्याने येथील कामेही आता आॅनलाईन होत आहेत. मात्र, राजुरा येथील डाक कार्यालयातील लिंक रोजच फेल राहात असल्याने अभिकर्त्यांनी आणलेले पैसे स्वीकारले जात नाही. त्यामुळे त्यांना रोजच पैसे परत न्यावे लागत आहे. एखाद्यावेळी अभिकर्त्यांच्या घरुन पैसे चोरीला गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच डाक विभागाच्या नियमानुसार दर महिन्यात २५ तारखेच्या आत पैसे भरावे लागतात. त्यानंतर आल्यास दंड बसतो. आता लिंक फेलमुळे जर पैसे उशिरा भरले जात असतील,तर अभिकर्त्यांनी दंड का भरावा, असा प्रश्नही विचारला जात आहे.डाक विभागाने राजुरा येथील कार्यालयात २४ सप्टेंबरपासून आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु पहिल्या दिवसापासूनच येथील कर्मचाऱ्यांना व अभिकर्त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लिंक नसणे, एरर येणे, लिंक असेल तर स्पीड कमी असणे अशा प्रकारच्या समस्या रोजच येत असल्याने अभिकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महिन्याची शेवटची तारखी येऊन ठेपली असताना अभिकर्त्याजवळ लॉट व पैसे तयार असूनही तांत्रिक कारणांमुळे पैसे भरले जाऊ शकत नाही. हा महिना गेल्यास पुढील १ तारखेपासून पुन्हा त्यांना दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आपली चूक नसतानाही दंड का भरावा, असा प्रश्न अभिकर्त्यांकडून विचारला जात आहे.दरम्यान, आॅनलाईन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणीकरिता म्हैसूर येथे तक्रारी पाठविल्या आहे. त्याचे निराकरण लवकरच होणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली विभागातील काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्याची कल्पना आपणाला असून वरिष्ठांकडे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. राजुरा पोष्ट कार्यालयात लवकरच कर्मचारी देण्याचा प्रयत्न करु. ज्या एजन्टला पैसे भरण्यास अडचणी येत आहेत आणि ज्यांचा या महिन्यात आयडी आलेला नाही, अशा आरडी एजंटला पुढील महिन्यात ग्राहकांचे पैसे भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड घेण्यात येणार नसल्याचेही डाक विभागाचे चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकारी शंभरकर यांनी सांगितले आहे. मंगळवारी आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक बिघाड आल्याने आरडी भरणाऱ्या एजंटमध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पैसे जमा न झाल्यास आर्थिक भुर्दंड बसणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)