शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चंद्रपूर जिल्हा राज्यात उत्तम करण्याचा संकल्प करु या

By admin | Updated: May 2, 2016 00:42 IST

‘एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे आपल्या विकासाचा केंद्रबिंदू दीन, दलित, शोषित, पीडित, ....

सुधीर मुनगंटीवार : महाराष्ट्र दिनाच्या मुख्य सोहळ्यात केले प्रतिपादनचंद्रपूर : ‘एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे आपल्या विकासाचा केंद्रबिंदू दीन, दलित, शोषित, पीडित, आदिवासी , शेतमजूर व शेतकरी असला पाहिजे असे सांगून चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये उत्तम जिल्हा करण्याचा संकल्प महाराष्ट्र दिनी करु या, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ते रविवारी येथे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, महापौर राखी कंचलार्वार, आ. नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरशे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, सभापती देवराव भोंगळे, स्वातंत्र सैनिक, अधिकारी, पत्रकार व विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन गरजेचे असून १ जुलै रोजी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याचा व संवर्धन करण्याचा संकल्प आहे. आपल्या जिल्हयात या योजनेंतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लावून पर्यावरण संतुलनासाठी पुढाकार घ्यावा. जलयुक्त शिवार हा महाराष्ट्र शासनाचा लोकसहभागातून पुढे जाणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या वर्षी या योजनेत जिल्हयातील २४९ गावांची निवड करण्यात आली असून या अभियानात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेतील ३६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागातील १३,६६७ लाभार्थ्यांची रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत निवड करण्यात आली असून त्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व जमातीच्या ४,४७० लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेत घरकुल मंजूर करण्यात आले आहे. चंद्रपूर तालुक्यात चिचपल्ली येथे स्थापन करण्यात येत असलेल्या बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १६ कोटी ७८ लक्ष ७२ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अल्पसंख्यकबहुल नागरी तसेच ग्रामीण क्षेत्राच्या विकास कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर व बल्लारपूर शहर तसेच राजोली, कोठारी, नांदगाव पोडे, बामणी, विसापूर या गावांमधील विकासकामांसाठी ७५ लक्ष ६३ हजार ७८६ रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. बल्लारपूर व चिमूर येथील तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असून चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय नूतनीकरण, बांधकाम, रंगरंगोटी इत्यादी बाबतच्या आठ कोटी ४२ लक्ष २७ हजार रुपये किमतीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयाचे काम वेगाने करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेव रकमेत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या अर्थसंकल्पात सदर ठेव रक्कम ५ कोटींवरुन १० कोटी रुपये करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर मुल आणि बल्लारपूर येथील बसस्थानकांचे आधुनिकीकरण व दजार्वाढ करण्यासाठी १३ कोटी ९४ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला. विविध क्षेत्रात पुरस्कार तसेच प्रावीण्य मिळविणाऱ्या अधिकारी, पोलीस व उद्योजक यांचा सत्कार यावेळी सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संविधानाची प्रास्ताविका व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)