शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
4
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
5
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
6
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
7
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
8
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
9
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
10
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
11
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
12
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
13
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
14
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
15
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
16
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
17
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
18
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
19
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
20
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीकडे केंद्र सरकारची पाठ

By admin | Updated: June 28, 2014 23:29 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने अगदी महिनाभरातच शेतकऱ्यांपुढे वाईट दिवसांचे ताट वाढले आहे, अशी खरमरित टिका शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली आहे.अलिकडेच केंद्र सरकारने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले. मात्र तूरडाळ आणि अन्य एकदोन धान्य वगळता सर्वच धान्याचे भाव अल्प प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याची टिका अ‍ॅड. चटप यांनी केली आहे. २०१४-१५ वर्षासाठी केंद्र शासनाने शेतमालाच्या आधारभूत किंमतीची घोषणा केली आहे. यात सोयाबिन, भूईमुग, मका, बाजरी या धान्याचा हमीभावात वाढ केली नाही. तर, कापूस, तूा, तांदूळ, सूर्यफुल, उडीद यात क्विंटलमागे फक्त ५० रुपयांनी वाढ केली आहे. ज्वारीसाठी ३० रुपये आणि मुग व तिळासाठी १०० रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यात आणि देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. त्या थांबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी स्वामिनाथन समितीने अहवाल सादर केला होता. त्यातील शिफारशी सध्याचे भाजपाप्रणित सरकार स्विकारेल अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. उत्पादन खर्चात वाढ होऊनही सरकारने भाववाढ मात्र केली नाही. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. याचा विचार मोदी सरकारनेही केलेला नाही. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात दिले होते. मात्र ते पाळलेले दिसत नाही. काँग्रेसच्या धारणावरच हे सरकारच चालत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)