शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीकडे केंद्र सरकारची पाठ

By admin | Updated: June 28, 2014 23:29 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने अगदी महिनाभरातच शेतकऱ्यांपुढे वाईट दिवसांचे ताट वाढले आहे, अशी खरमरित टिका शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली आहे.अलिकडेच केंद्र सरकारने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले. मात्र तूरडाळ आणि अन्य एकदोन धान्य वगळता सर्वच धान्याचे भाव अल्प प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याची टिका अ‍ॅड. चटप यांनी केली आहे. २०१४-१५ वर्षासाठी केंद्र शासनाने शेतमालाच्या आधारभूत किंमतीची घोषणा केली आहे. यात सोयाबिन, भूईमुग, मका, बाजरी या धान्याचा हमीभावात वाढ केली नाही. तर, कापूस, तूा, तांदूळ, सूर्यफुल, उडीद यात क्विंटलमागे फक्त ५० रुपयांनी वाढ केली आहे. ज्वारीसाठी ३० रुपये आणि मुग व तिळासाठी १०० रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यात आणि देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. त्या थांबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी स्वामिनाथन समितीने अहवाल सादर केला होता. त्यातील शिफारशी सध्याचे भाजपाप्रणित सरकार स्विकारेल अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. उत्पादन खर्चात वाढ होऊनही सरकारने भाववाढ मात्र केली नाही. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. याचा विचार मोदी सरकारनेही केलेला नाही. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात दिले होते. मात्र ते पाळलेले दिसत नाही. काँग्रेसच्या धारणावरच हे सरकारच चालत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)