शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
2
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
3
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
4
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
5
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
6
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
7
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
8
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
9
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
10
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
11
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
12
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
13
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
14
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
15
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
16
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा
17
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
18
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
19
पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार
20
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीकडे केंद्र सरकारची पाठ

By admin | Updated: June 28, 2014 23:29 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाला ५० टक्के नफा देऊ म्हणणाऱ्या भाजपाप्रणित केंद्र सरकारने आधारभूत किंमती वाढविताना शेतकऱ्यानची दिशाभूल केली. ‘अच्छे दिन’ आणण्याचा वादा करणाऱ्या या सरकारने अगदी महिनाभरातच शेतकऱ्यांपुढे वाईट दिवसांचे ताट वाढले आहे, अशी खरमरित टिका शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली आहे.अलिकडेच केंद्र सरकारने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले. मात्र तूरडाळ आणि अन्य एकदोन धान्य वगळता सर्वच धान्याचे भाव अल्प प्रमाणात वाढविले आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याची टिका अ‍ॅड. चटप यांनी केली आहे. २०१४-१५ वर्षासाठी केंद्र शासनाने शेतमालाच्या आधारभूत किंमतीची घोषणा केली आहे. यात सोयाबिन, भूईमुग, मका, बाजरी या धान्याचा हमीभावात वाढ केली नाही. तर, कापूस, तूा, तांदूळ, सूर्यफुल, उडीद यात क्विंटलमागे फक्त ५० रुपयांनी वाढ केली आहे. ज्वारीसाठी ३० रुपये आणि मुग व तिळासाठी १०० रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यात आणि देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. त्या थांबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी स्वामिनाथन समितीने अहवाल सादर केला होता. त्यातील शिफारशी सध्याचे भाजपाप्रणित सरकार स्विकारेल अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची साथ नाही. उत्पादन खर्चात वाढ होऊनही सरकारने भाववाढ मात्र केली नाही. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. याचा विचार मोदी सरकारनेही केलेला नाही. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात दिले होते. मात्र ते पाळलेले दिसत नाही. काँग्रेसच्या धारणावरच हे सरकारच चालत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)