शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

बोनससाठी तेंदूपत्ता मजुरांची धडक

By admin | Updated: October 25, 2016 00:34 IST

तेंदूपत्ता मजुरांना बोनस व जबरानजोत शेतकऱ्यांना जमीन व घराचे पट्टे देण्यात यावे या मागणीसाठी...

शेकडो मजुरांचा सहभाग : मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर मोर्चाचंद्रपूर : तेंदूपत्ता मजुरांना बोनस व जबरानजोत शेतकऱ्यांना जमीन व घराचे पट्टे देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी शेकडो तेंदूपत्ता मजुरांनी व शेतकऱ्यांनी चंद्रपुरात मोर्चा काढला. गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा सिव्हिल लाईन स्थित मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडकला व तेथे धरने देण्यात आले. राज्यात दरवर्षी शेकडो मजूर तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. यात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा व नागपूर या जिल्ह्यातून राज्यभरात ८२ टक्के उत्पादन होते. या मजुरांना सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातून प्रत्येक मजुराला बोनस स्वरूपात ८ ते १० हजार मिळत होते. यातून त्यांना बराच हातभार लागत होता. मात्र मागच्या वर्षीपासून विद्यमान शासनाने बोनस देणे बंद केल्याने मजुरांत तीव्र रोष पसरला आहे.विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे बाबूराव वाघमारे, सार्इंनाथ बुच्चे, देवेन्द्र बेले, रामभाऊ टोंगे, अनिल दुगेंडीवार, गजानन दिवसे यांच्या नेतृत्वात मजुरांनी सोमवारी दुपारी १२ वाजता महाकाली मंदिरापासून मोर्चा काढला. यात मजूर व शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. मोर्चात सहभागी महिला व पुरूषांनी बोनस देण्याची मागणी करीत वनमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चा मुख्य वनसरंक्षक कार्यालयासमोर पोहोचल्यावर धरने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी केंद्रीय वनमंत्री, राज्यपाल व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन पाठविले. (स्थानिक प्रतिनिधी)मजुरांचे अधिकार हिरावले : नरेश पुगलियाचंद्रपूर : तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तेंदूपत्ता मजुरांना बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यमान युती शासनाने तेंदूपत्ता मजुरांचे अधिकार हिरावून बोनसपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कामगार नेते नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केला. तेंदूपत्ता मजुरांना बोनस तथा जबरानजोत शेतकऱ्यांना जमीन व घरांचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. माहिती देताना ते म्हणाले, विद्यमान सरकार शेतकरीविरोधी आहे. तेंदूपत्ता मजुरांना दहा ते बारा हजार रूपये बोनस मिळत होते. मात्र विद्यमान राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे मजुर व शेतकऱ्यांत रोष पसरला असून त्यांचे हक्क त्यांना देण्याची मागणी नरेश पुगलिया यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री, वन तथा पर्यावरण मंत्रालय, राज्यपाल, वन विभागाचे सचिव, नागपूरचे मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन दिल्याची माहिती नरेश पुगलिया यांनी दिली.