शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बोनससाठी तेंदूपत्ता मजुरांची धडक

By admin | Updated: October 25, 2016 00:34 IST

तेंदूपत्ता मजुरांना बोनस व जबरानजोत शेतकऱ्यांना जमीन व घराचे पट्टे देण्यात यावे या मागणीसाठी...

शेकडो मजुरांचा सहभाग : मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर मोर्चाचंद्रपूर : तेंदूपत्ता मजुरांना बोनस व जबरानजोत शेतकऱ्यांना जमीन व घराचे पट्टे देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी शेकडो तेंदूपत्ता मजुरांनी व शेतकऱ्यांनी चंद्रपुरात मोर्चा काढला. गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा सिव्हिल लाईन स्थित मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडकला व तेथे धरने देण्यात आले. राज्यात दरवर्षी शेकडो मजूर तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. यात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा व नागपूर या जिल्ह्यातून राज्यभरात ८२ टक्के उत्पादन होते. या मजुरांना सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातून प्रत्येक मजुराला बोनस स्वरूपात ८ ते १० हजार मिळत होते. यातून त्यांना बराच हातभार लागत होता. मात्र मागच्या वर्षीपासून विद्यमान शासनाने बोनस देणे बंद केल्याने मजुरांत तीव्र रोष पसरला आहे.विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे बाबूराव वाघमारे, सार्इंनाथ बुच्चे, देवेन्द्र बेले, रामभाऊ टोंगे, अनिल दुगेंडीवार, गजानन दिवसे यांच्या नेतृत्वात मजुरांनी सोमवारी दुपारी १२ वाजता महाकाली मंदिरापासून मोर्चा काढला. यात मजूर व शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. मोर्चात सहभागी महिला व पुरूषांनी बोनस देण्याची मागणी करीत वनमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चा मुख्य वनसरंक्षक कार्यालयासमोर पोहोचल्यावर धरने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी केंद्रीय वनमंत्री, राज्यपाल व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना निवेदन पाठविले. (स्थानिक प्रतिनिधी)मजुरांचे अधिकार हिरावले : नरेश पुगलियाचंद्रपूर : तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तेंदूपत्ता मजुरांना बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यमान युती शासनाने तेंदूपत्ता मजुरांचे अधिकार हिरावून बोनसपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कामगार नेते नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केला. तेंदूपत्ता मजुरांना बोनस तथा जबरानजोत शेतकऱ्यांना जमीन व घरांचे पट्टे देण्यात यावे, या मागणीसाठी नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. माहिती देताना ते म्हणाले, विद्यमान सरकार शेतकरीविरोधी आहे. तेंदूपत्ता मजुरांना दहा ते बारा हजार रूपये बोनस मिळत होते. मात्र विद्यमान राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे मजुर व शेतकऱ्यांत रोष पसरला असून त्यांचे हक्क त्यांना देण्याची मागणी नरेश पुगलिया यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री, वन तथा पर्यावरण मंत्रालय, राज्यपाल, वन विभागाचे सचिव, नागपूरचे मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन दिल्याची माहिती नरेश पुगलिया यांनी दिली.