शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

रानमेवा नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST

सास्ती : शिशिर ऋतूच्या काळात पानगळ सुरू होऊन साऱ्या सृष्टीला एक प्रकारची मरगळ आल्याचा भास होतो. अशातच शिशिरानंतर वसंतऋतूचे ...

सास्ती : शिशिर ऋतूच्या काळात पानगळ सुरू होऊन साऱ्या सृष्टीला एक प्रकारची मरगळ आल्याचा भास होतो. अशातच शिशिरानंतर वसंतऋतूचे आगमन होते. झाडांना नवीन पालवी फुटू लागते. हा आनंददायी ऋतुबदल चैत्रात घडतो. याच कालावधी जंगलात टेंभरं, खिरण्या, चारबिया सारख्या विविध प्रकारचे निसर्गाचा गोडवा असलेली फळे पूर्वी बाजारात विक्रीला यायची. परंतु हायटेक जीवनमानामुळे या जंगली फळांची जागा मात्र आता विदेशी फळांनी घेतली आहे. त्यामुळे हा रानमेवा लुप्त होऊन भावी पिढीला याचा गोडवा चाखता येणे शक्य होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

चंद्रपूर जिल्हा हा निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. परिसरात निसर्गरम्य वातावरण असून येथील रानावनात बहुउपयोगी वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या वनस्पतींसह रानातील रानमेवा असलेली विविध फळे या वनात आहेत. त्यात टेंभरे, चारबिया, खिरण्या, येरोन्या, काटबोरे, विलायती चिंचा, कवठ अशी विविध जंगली फळे आहेत. ही फळे बाजारात काही वर्षांपूर्वी विक्रीला राहत होती. ग्रामीण भागातील महिलांचा तो व्यवसाय असायचा. त्यातून मोठी मिळकतही होत होती. परंतु आज होणाऱ्या जंगलतोडीमुळे किंवा जंगलात जंगली जनावरांच्या वावर वाढल्यामुळे ही फळे बाजारात येणे कठीण झाले आहे. मोठ्या मेहनतीने ही फळे आणली तरी या फळांकडे लक्ष देण्यास कुणीही तयार नाही. कारण आज बाजारात विदेशातील फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. हायटेक जीवनमानाच्या ओघात निसर्गाची देण असलेला रानमेवा दूर सारल्या जात आहे.

बॉक्स

पूर्वी शाळेसमोर लागायची दुकाने

पूर्वी शाळेसमोरही ही जंगली फळे विकल्या जात होती. शाळेतील मुले ही फळे मोठ्या आवडीने खात होती. परंतु आज या ठिकाणीसुद्धा फळांची जागा चॉकलेट व बिस्किटांनी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला निसर्गाची देण असलेल्या व गोडव्याने तृप्त करून टाकणाऱ्या फळे देणाऱ्या त्या जंगलाबद्दल आपुलकीही भावी पिढीपासून दूर जाताना दिसून येत आहे.

बॉक्स

औषधीयुक्त गुणधर्म

ही सर्व जंगली फळे मानवाच्या आरोग्यास उपयुक्त असून यात मोठ्या प्रमाणात औषधीयुक्त गुणधर्म आहेत. या फळांद्वारे जीवनसत्त्वे तथा पोषणमूल्य मिळते. अशा या उपयुक्त वनस्पती नष्ट होताना दिसून येत आहेत. वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे जंगलांची तोड मोठ्या प्रमाणात होत असून या फळे देणाऱ्या वृक्षांचीही कत्तल होत आहे. तेंदूपत्ता संकलनात....... या टेंभराच्या झाडांची.......... पाने मोठ्या प्रमाणात तोडली जातात. त्यामुळे या झाडांची फळे दिसेनाशी झाली आहेत.