राजुरा : वरूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग राजुराद्वारे आयोजित ‘एक गाव, एक दिवस’ या अभियानाचा शुभारंभ राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी या अभियानाचा लाभ शेतकरी बंधूंना मिळावा, कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तेव्हा शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अग्रक्रम मिळायला हवा. शेतीपंपासाठी लाइन उपलब्ध करून देणे, बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनांची अंमलबजावणी योग्यपणे करणे, यासाठी प्रशासनाने कंबर कसली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी वरूरच्या सरपंच संगीता कोडापे, पं. स. सभापती मुमताज जावेद अब्दुल, पं. स. उपसभापती मंगेश गुरनुले, पं. स. सदस्य रामदास पुसाम, सुनील देशपांडे, चिवंडे, कार्यकारी अभियंता तेलंग, उपअभियंता लोहे, ग्रामसदस्य वैशाली ढुमने, पूजा पुसाम, गणपत पंधरे, आबाजी धानोरकर, मोरेश्वर धानोरकर, नारायण थिपे, मनोहर पिदूरकर, देवाजी भोंगळे, धनराज अवघान, नामदेव जानवे, भाढूराव ढुमने, अशोक आत्राम, चेतन जयपुरे उपस्थित होते.