शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

आज आणि उद्या मतदार बनण्याची शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:08 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नसेल तर लगेच ६ क्रमांकाचा अर्ज करून मतदार व्हावे, ही शेवटची संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ंसर्व महाविद्यालयात अर्ज उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नसेल तर लगेच ६ क्रमांकाचा अर्ज करून मतदार व्हावे, ही शेवटची संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात जारी केलेल्या सूचनेनुसार संपूर्ण देशभर मतदार नोंदणी शेवटच्या टप्प्यात असून याचा फायदा उद्या व परवा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: नवमतदारांनी ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्या सर्वांनी या मोहिमेचा फायदा घ्यावा. फक्त आधार कार्ड व आपले रहिवासी ओळखपत्र व एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन फॉर्म नंबर ६ भरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाईन पद्धतीनेदेखील मतदारांना आपल्या नावाची नोंदणी करता येते. तसेच २ मार्चला जिल्ह्यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबत सूचना करण्यात आली असून उद्या व परवा कॉलेजमध्येदेखील मतदान नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.मतदार यादीमधील नाव तपासणे, चंद्रपूरमध्ये दीर्घ कालावधीपासून रहिवासी असणाऱ्यांनी या जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करणे व अन्य त्यांच्या कोणत्याही अडचणी संदर्भात नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रावर भेट देऊन आपली अडचण दूर करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेला उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.यावेळी इव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅट यंत्रणेच्या मार्फत मतदान किती सुलभ, सहज व पारदर्शी झाले आहे, याचे पत्रकारांसमक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.