शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आज आणि उद्या मतदार बनण्याची शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:08 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नसेल तर लगेच ६ क्रमांकाचा अर्ज करून मतदार व्हावे, ही शेवटची संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ंसर्व महाविद्यालयात अर्ज उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नसेल तर लगेच ६ क्रमांकाचा अर्ज करून मतदार व्हावे, ही शेवटची संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात जारी केलेल्या सूचनेनुसार संपूर्ण देशभर मतदार नोंदणी शेवटच्या टप्प्यात असून याचा फायदा उद्या व परवा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: नवमतदारांनी ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्या सर्वांनी या मोहिमेचा फायदा घ्यावा. फक्त आधार कार्ड व आपले रहिवासी ओळखपत्र व एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन फॉर्म नंबर ६ भरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाईन पद्धतीनेदेखील मतदारांना आपल्या नावाची नोंदणी करता येते. तसेच २ मार्चला जिल्ह्यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबत सूचना करण्यात आली असून उद्या व परवा कॉलेजमध्येदेखील मतदान नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.मतदार यादीमधील नाव तपासणे, चंद्रपूरमध्ये दीर्घ कालावधीपासून रहिवासी असणाऱ्यांनी या जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करणे व अन्य त्यांच्या कोणत्याही अडचणी संदर्भात नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रावर भेट देऊन आपली अडचण दूर करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेला उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.यावेळी इव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅट यंत्रणेच्या मार्फत मतदान किती सुलभ, सहज व पारदर्शी झाले आहे, याचे पत्रकारांसमक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.