शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:35 IST

उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसान नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून फेरफार नोंदी नाही : अधिकारी सुस्त जनता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसान नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कोठारी येथील आशाबाई पेटकुले यांनी सहा महिन्यांपूर्वी आई - वडील मरण पावल्यानंतर वारसान नोंद फेरफारसाठी अर्ज केला होता. यासाठी त्या सतत सहा महिन्यांपासून भूमी अभिलेख कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र त्यांच्या प्रकरणात कुठल्याही त्रुटी नसतानाही वारसान नोंद घेण्यात आली नाही. या कार्यालयात बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील जनता मोजणी, वारसान फेरफार, विक्री नोंदी घेण्यासाठी अर्ज करीत असतात. मात्र नागरिकांच्या अर्जावर योग्य तो निर्णय घेवून निकाली काढणे आवश्यक असताना त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. या कार्यालयात शेकडो प्रकरणे प्रलंबित असून कामचुकार कर्मचाऱ्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक नसून सध्या कार्यरत असलेल्या उपअधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम होत आहे. आपल्या अर्जाचे काम झाले का, याकरिता विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना योग्य माहिती दिली जात नाही व उद्धटपणे बोलून हाकलून लावले जाते.काही कर्मचारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चिरीमिरीची मागणी करून सतावत असतात. विविध कामासाठी व फेरफार, मोजणीचे अर्ज लवकरच निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेवून सैरावैरा सुटलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.कार्यालयातील काही कर्मचारी आपण सूचविलेल्या कामाकडे दुर्लक्ष असतात. आपणाकडे बल्लारपूर व पोंभुर्णा या तालुक्याचा प्रभार असल्याने दोन्हीकडे लक्ष द्यावे लागते. मात्र फेरफारचे काम ज्यांच्याकडे सोपविले होते, ते निष्क्रीय असल्याने त्यांचे वेतन थांबवून त्याचा प्रभार दुसऱ्यास दिला आहे. जनतेचे अर्ज लवकरच निकाली काढून व विस्कटलेला कारभार नियमित करणार.-एस. टी. वाकटी, उपअधीक्षकभूमी अभिलेख बल्लारपूर.