शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

बनावट दस्तावेजाच्या आधारे जमिनीचे केले फेरफार

By admin | Updated: November 29, 2015 01:58 IST

गुंजेवाही येथील तलाठी साजा क्र. १९ अंतर्गत येत असलेल्या खैरी (चक) येथील हरी डोमा कटकवार यांच्या वाटपात मिळालेल्या त्यांच्या मालकीची ...

संघटनेची मागणी : तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करागुंजेवाही : गुंजेवाही येथील तलाठी साजा क्र. १९ अंतर्गत येत असलेल्या खैरी (चक) येथील हरी डोमा कटकवार यांच्या वाटपात मिळालेल्या त्यांच्या मालकीची गट क्र. २१८ सशर्त भोगवट वर्ग २ व आराजी ०.९१ हे.आर. या जागेची (जमिनीचे) बनावट दस्तावेज तयार करून फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यासोबत संगनमत करून नोटीसवर संबंधिताची सही न घेता ती देणाऱ्या संबंधित महसूल विभागाच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार उन्मुलन संघटनेने वरिष्ठ स्तरावर केलेल्या तक्रारीत केली आहे.हरी डोमा कटकवार यांना सन १९६६ मध्ये सशर्त भूमिधारी हक्कावर वाटपात ०.९१ आर. जमीन मिळाली होती. या जमिनीच्या हस्तांतरणावर निर्बंध असल्यामुळे या जमिनीचे हस्तांतरण व्हायला नको होते. परंतु परिस्थिती हलाकीची असल्याने ते दुसऱ्याला ठेका पद्धतीने शेती देत होते. ते अंदाजे सात-आठ वर्षाअगोदर मरण पावले. त्यांचा वारस म्हणून मुलगी असताना गुंजेवाही येथील मारोती हरी गुरनुले यांनी गुंजेवाही येथील दलालाच्या मार्फतीने तत्कालीन तलाठी पि.के. शेंडे व तत्कालीन मंडल अधिकारी वाय.एच. चांदेकर यांना हाताशी धरून ती जमीन आपल्या ताब्यात घेतली. काही दिवसातच तहसिलदार सिंदेवाही यांना ६ डिसेंबर २०१० ला हरी डोमा कटकवार याने मागील ३५ वर्षापासून पत्ता नसल्याने, वारसदार मुलगी असतानासुद्धा माझ्या कब्जात असलेल्या जमिनीच्या रेकार्डवर भोगवटदार म्हणून नाव चढवण्यासाठी अर्ज सादर केला. तेव्हा तलाठी यांनी प्रकरणाची गावात शहानिशा न करता त्यांनी दिलेल्या दलालाकरवी अर्जाचा स्वीकार करून ९/१२ ची नोटीस काढून हरी डोमा कडकवार यांची सही न घेता परस्पर साक्षदारांच्या सह्या घेतल्या. ५ जानेवारी १९९६ च्या २० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर बनावट सही करून पंच म्हणून काही लोकांच्या सह्या घेतल्या.तलाठी यांनी अर्ज व बनावट स्टॅम्पच्या आधारे वाटपात मिळालेल्या जमिनीचा २१ डिसेंबर २०१० ला फेरफार नोंद वहीवर खोडतोड करून २१ जानेवारी २०११ अशी फेरफारवर नोंद घेतली व मंडल अधिकारी यांनी कागद पत्राची तपासणी न करता ९/१२ च्या नोटीसावर कटकवार यांची सही नसताना २० रुपयाच्या बक्षीस पत्राच्या आधारे देणार-घेणार हाजर असून बक्षीस पत्र लिहून दिल्याचे कबूल करुन ४ फेब्रुवारी २०११ ला फेरफारची नोंद केली. याबाबत संघटनेकडे तक्रार प्राप्त होताच संपूर्ण दस्ताऐवज माहितीच्या अधिकारात मागून वरिष्ठ स्तरावर तक्रार केली. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त नागपूर यांनी २४ नोव्हेंबर २०१४, जिल्हाधिकारी १४ जानेवारी २०१५ व उपविभागीय अधिकारी चिमूर यांना चौकशी करून कारवाई करावी असे पत्र देण्यात आले. त्या पत्रावर मुख्य सचिव व सचिव, महसुल व वनविभाग मुंबई यांच्या संदर्भाचा उल्लेख केला असतानासुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही. तसेच तहसीलदार सिंदेवाही यांच्या सोबत या गंभीर प्रकरणाबाबत सतरा ते अठरा वेळा मौखिक चर्चा करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा व जमिनीचा फेरफार रद्द करून वरिष्ठ स्तरावर देण्यात येणारी प्रत करून द्यावी, असे वारंवार सुचविले असतानासुद्धा त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होवूनही संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे व वरिष्ठांच्या पत्राला केरांची टोपली दाखविली जात आहे.संघटनेने वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा महसूल विभागाने अशा प्रकारे वरिष्ठांची दिशाभूल करून अटी शर्तींचा भंग करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर चौकशी अंती कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नाही. संपूर्ण रेकार्ड ताब्यात घेऊन संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.(वार्ताहर)