शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

अल्पावधीतच वाहून गेला लाखो रूपयांचा बंधारा

By admin | Updated: September 14, 2016 00:49 IST

मूल तालुक्यातील ताडाळा येथे जलशिवार योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चालु ...

ग्रामस्थांनी केली तक्रार : अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणीभेजगाव : मूल तालुक्यातील ताडाळा येथे जलशिवार योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चालु आर्थिक सत्रात जवळपास सात लाख रूपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र हा बंधारा अल्पावधीतच वाहून गेल्याने ग्रामपंचायती विरोधात शेतकऱ्यांत रोष पसरला आहे. त्यामुळे ग्रामसेवक व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच त्रस्त असून दरवर्षी दुष्काळामुळे होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना बंधाऱ्याच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक व्हावी, त्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, पाणी अडून तिथेच जिरावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारामुळे या योजनेला ग्रहण लागल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांनी वारंवार केलेली मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सात लाख रुपये खर्च करून पाच महिन्यापूर्वी बापूजी बामणे यांच्या शेताजवळील नाल्यावर बंधारा बांधला. यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून बंधाऱ्याचे काम नित्कृष्ठ झाल्याने पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेला. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ गेले असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.सदर बंधाऱ्याचे काम ग्रामसेवक, कंत्राटदार, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे अंदाजपत्रकानुसार सिमेंट क्राँक्रीट वापरले नाही. माती मिश्रीत नित्कृष्ठ दर्जाचे साहित्य वापरुन बांधकाम केल्याने बंधारा अल्पावधीतच वाहून गेला. त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी न साचता पाणी उमा नदीला वाहून गेले. परिणामत: दुष्काळस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या बंधारा कामाची चौकशी करून ग्रामसेवक, कंत्राटदारावर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सीईओ यांना दिलेल्या निवेदनातून बाबुराव जरातेसह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)