शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात

By admin | Updated: November 7, 2016 01:34 IST

शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात गेली. निसर्गाची अवकृपा, शासनाचे दुर्लक्ष,

कापूस, सोयाबीनला अत्यल्प भाव : शासकीय दर निश्चित करागडचांदूर : शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात गेली. निसर्गाची अवकृपा, शासनाचे दुर्लक्ष, शेतमालाची कवडीमोल भावाने विक्री, व्यापाऱ्याकडून लूट यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.यावर्षी खरीप हंगमात चांगले उत्पन्न होईल, अशी आशा बळीराजाला होती. कापूस सोयाबीन पीक चांगले होते. मात्र निसर्गाने वक्रदृष्टी दाखवून तोंडी आलेला घास हिरावून नेला. अतिवृष्टीने कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. दिवाळी सण आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन कवडीमोल भावाने विकले. उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही. सोयाबिन शेतात तयार झाले तेव्हाच अतिवृष्टी झाली व सोयाबीनची प्रत बिघडली. यात शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना नुकसान सहन करावा लागले. व्यापाऱ्यांनी मात्र सोयाबिन निकृष्ट दर्जाचे असल्याने कवडीमोल भावाने खरेदी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अतिवृष्टीने खराब झालेल्या सोयाबिनची शासकीय दराने खरेदी करावयास पाहिजे होती. मात्र शासनाने दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने सोयाबिनची विक्री नाईलाजास्तव करावी लागली. उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकऱ्यापुढे प्रचंड आर्थिक संकट उभे आहे. कर्ज कसे फेडावे, ही चिंता आहेच. (वार्ताहर)मुख्यमंत्री गप्प का ?सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना विधानसभेवर शेतकरी दिंडी काढून सोयाबिनला सहा हजार भाव मागितला होता. एक लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले होते. मग आता सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस सोयाबिनला सहा हजार भाव का देत नाही, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे. केवळ सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.