शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात

By admin | Updated: November 7, 2016 01:34 IST

शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात गेली. निसर्गाची अवकृपा, शासनाचे दुर्लक्ष,

कापूस, सोयाबीनला अत्यल्प भाव : शासकीय दर निश्चित करागडचांदूर : शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी अंधारात गेली. निसर्गाची अवकृपा, शासनाचे दुर्लक्ष, शेतमालाची कवडीमोल भावाने विक्री, व्यापाऱ्याकडून लूट यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.यावर्षी खरीप हंगमात चांगले उत्पन्न होईल, अशी आशा बळीराजाला होती. कापूस सोयाबीन पीक चांगले होते. मात्र निसर्गाने वक्रदृष्टी दाखवून तोंडी आलेला घास हिरावून नेला. अतिवृष्टीने कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. दिवाळी सण आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन कवडीमोल भावाने विकले. उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही. सोयाबिन शेतात तयार झाले तेव्हाच अतिवृष्टी झाली व सोयाबीनची प्रत बिघडली. यात शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना नुकसान सहन करावा लागले. व्यापाऱ्यांनी मात्र सोयाबिन निकृष्ट दर्जाचे असल्याने कवडीमोल भावाने खरेदी केली. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अतिवृष्टीने खराब झालेल्या सोयाबिनची शासकीय दराने खरेदी करावयास पाहिजे होती. मात्र शासनाने दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने सोयाबिनची विक्री नाईलाजास्तव करावी लागली. उत्पादन खर्च न निघाल्याने शेतकऱ्यापुढे प्रचंड आर्थिक संकट उभे आहे. कर्ज कसे फेडावे, ही चिंता आहेच. (वार्ताहर)मुख्यमंत्री गप्प का ?सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना विधानसभेवर शेतकरी दिंडी काढून सोयाबिनला सहा हजार भाव मागितला होता. एक लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले होते. मग आता सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस सोयाबिनला सहा हजार भाव का देत नाही, असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे. केवळ सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.