शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

मोबाईल नेटवर्कअभावी शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST

जिवती : यंदाचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू झाले आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील वर्षाप्रमाणेच ...

जिवती : यंदाचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू झाले आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मागील वर्षाप्रमाणेच ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शालेय जगातील नव्या तंत्रस्नेही युगामध्ये मुला-मुलींची एन्ट्री झाली आहे. मात्र जीवतीसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी- सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे काय होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाला गेल्या वर्षभरात सुटी मिळाली होती. मागील संपूर्ण वर्ष ऑनलाईन माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शाळा प्रत्यक्ष भरल्याच नाहीत, तर माध्यमिक शाळा अवघ्या एक ते दोन महिन्यांसाठी सुरू करण्यात आल्या. पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. आता या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्गाचे शिक्षणही ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. परंतु, जीवती तालुक्यासारख्या ग्रामीण भागात अनेकांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. तसेच मोबाईलला नेटवर्कमिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

पीडीएफ स्वरूपात मिळणार पुस्तके

बालभारतीने इयत्ता पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकांमधील ''क्यूआर कोडच्या'' माध्यमातून शिक्षण सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच सोमवारपासून शाळेला सुरुवात झाली. परंतु, ती ऑनलाईन स्वरुपात झाली आहे.

कोट

- सरकारच्या धोरणानुसार शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले असले, तरी शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या सूचनेनुसार शिक्षकांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- सचिनकुमार मालवी,

शिक्षण विस्तार अधिकारी,

पंचायत समिती, जिवती