शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

हायस्पीड सेवेचा अभाव; ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:33 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक तालुका स्तरावर हायस्पीड इंटरनेट सेवा नसल्याने, ग्राहक हायस्पीड इंटरनेट सेवेपासून वंचित आहेत. डिजिटल इंडियाची पाळेमुळे ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक तालुका स्तरावर हायस्पीड इंटरनेट सेवा नसल्याने, ग्राहक हायस्पीड इंटरनेट सेवेपासून वंचित आहेत. डिजिटल इंडियाची पाळेमुळे रोवताना या बाबीची पूर्तता होण्यासाठी तालुका स्तरावर हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

श्रावणबाळ लाभार्थी वेतनाच्या प्रतीक्षेत

चंद्रपूर : श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित असून, त्यांना तातडीने वेतन देण्यात यावे, अशी मागणी आहे. बहुतांश तालुक्यातील लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेसाठी निवड करण्यात आली.

कार्यालयात तक्रारपेट्याची मागणी

चंद्रपूर : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी असतात. काही जण त्या प्रत्यक्ष सांगू शकत नाही. अशांना आपल्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी प्रत्येक कार्यालयात तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, आज या सर्व तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.

उपवासाचे साहित्य महागले

चंद्रपूर : नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा असल्याने अनेक जण उपवास करीत असतात. त्यामुळे उपवासाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्यांची वस्तूची मागणी असते. त्यामुळे शेंगदाणे, साबुदाणा, भगर आदींच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी, श्रावणातील उपवासही महागला असल्याचे चित्र आहे.

रामसेतूकडे पोलीस गस्त वाढवावी

चंद्रपूर : येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रामसेतू पुलाकडे सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी असते. युवक-युवतींचा मोठा गराडा असतो. अनेक जण सेल्फी काढण्यासाठी गर्दी करीत असतात, परंतु येथून मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असल्याने, अपघाताची संख्या नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

महागाई कमी करण्याची मागणी

चंद्रपूर : मागील काही महिन्यांत महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूचे दर गगणाला भिडले आहे. पूर्वीच कोरोनामुळे जनसामान्याचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच सततच्या दरवाढीने आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कर्ज वितरण मोहीम राबवावी

चंद्रपूर : कोरोनाने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच नोकरभरती बंद आहे. परिणामी, अनेक जण बेरोजगार आहे. त्यामुळे शासनाने बेरोजगारांसाठी कर्ज वितरण मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. शासनाकडून बेरोजगारांसाठी अनेक मोहीम राबविण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही.