शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी शेतकऱ्यांची झोळी अजूनही रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:48 IST

शेतमालाच्या दरवाढीवरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पसारा अवलंबून आहे. सध्या कापूस वगळता सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत.

शेतमालाच्या दरवाढीची आशा मावळली : कापूस वगळता शेतमालाचे भाव पडलेगोवरी : शेतमालाच्या दरवाढीवरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पसारा अवलंबून आहे. सध्या कापूस वगळता सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत. मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. आज ना उद्या शेतमालाचे भाव वाढेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतमालाच्या दरवाढीअभावी परवड झाल्याने शेतकऱ्यांची झोळी अजूनही रितीच आहे.शेतकरी दिवसंरात्र शेतात राबतो. परंतु शेतकऱ्यांच्या पाठिशी आज कुणीही उरला नाही. त्यामुळे शेतकरी कायमचा निराधार झाला आहे. शेतातील पिकलेला माल घरी आल्यावर शेतमालाचे भाव पाडले जाते. ही या देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी कशीबशी शेती पिकविली. परंतु शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चापेक्षा शेतमालाला मिळणारा दर तोकडा आहे. हा कालआजचा अनुभव नाही तर गेल्या ५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच घडत आहे. यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव आहे. मात्र कापूस वगळता सोयाबीन, तूर, ज्वारी, गहु, हरभरा, या नगदी पिकांचे भाव पडले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. धानाला दोन हजार रुपयाच्यावर भाव चढत नाही. मग शेतकऱ्यांनी केवळ शेतातच राबायचे काय? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आमच्या मायबाप सरकारला शोधता आलेले नाही.शेतमालाला तोकडा दर असल्याने शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढणे अपेक्षित आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत आजपर्यंत उलटच घडत आहे. पुर्वीसारखा आज शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर कोणताही राजकीय नेता पेटून उठताना दिसत नाही. एखाद्या शेतकरी नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला तर सरकार त्याचा आवाज दाबून टाकतात. ना पुढारी, ना सरकार पाठिशी, मग शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचा न्याय मागायचा कुणाकडे? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही अनुत्तरीतच आहे. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुनही शेतकऱ्यांना ‘घामाचे दाम मिळत नाही’ त्यामुळे शेतात राबूनही शेतकऱ्यांची झोळी अजूनही रितीच आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ गेले कुठे?शेतकऱ्यांचे अच्छे दिन येईल, असे स्वप्न निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारने दाखविले होते. शेतकऱ्यांनाही आपले सुखाचे दिवस येईल, अशी आस होती. मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अच्छे दिनच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे.