शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कष्टकरी शेतकऱ्यांची झोळी अजूनही रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:48 IST

शेतमालाच्या दरवाढीवरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पसारा अवलंबून आहे. सध्या कापूस वगळता सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत.

शेतमालाच्या दरवाढीची आशा मावळली : कापूस वगळता शेतमालाचे भाव पडलेगोवरी : शेतमालाच्या दरवाढीवरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पसारा अवलंबून आहे. सध्या कापूस वगळता सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत. मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. आज ना उद्या शेतमालाचे भाव वाढेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतमालाच्या दरवाढीअभावी परवड झाल्याने शेतकऱ्यांची झोळी अजूनही रितीच आहे.शेतकरी दिवसंरात्र शेतात राबतो. परंतु शेतकऱ्यांच्या पाठिशी आज कुणीही उरला नाही. त्यामुळे शेतकरी कायमचा निराधार झाला आहे. शेतातील पिकलेला माल घरी आल्यावर शेतमालाचे भाव पाडले जाते. ही या देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी कशीबशी शेती पिकविली. परंतु शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चापेक्षा शेतमालाला मिळणारा दर तोकडा आहे. हा कालआजचा अनुभव नाही तर गेल्या ५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच घडत आहे. यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव आहे. मात्र कापूस वगळता सोयाबीन, तूर, ज्वारी, गहु, हरभरा, या नगदी पिकांचे भाव पडले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. धानाला दोन हजार रुपयाच्यावर भाव चढत नाही. मग शेतकऱ्यांनी केवळ शेतातच राबायचे काय? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आमच्या मायबाप सरकारला शोधता आलेले नाही.शेतमालाला तोकडा दर असल्याने शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढणे अपेक्षित आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत आजपर्यंत उलटच घडत आहे. पुर्वीसारखा आज शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर कोणताही राजकीय नेता पेटून उठताना दिसत नाही. एखाद्या शेतकरी नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला तर सरकार त्याचा आवाज दाबून टाकतात. ना पुढारी, ना सरकार पाठिशी, मग शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचा न्याय मागायचा कुणाकडे? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही अनुत्तरीतच आहे. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुनही शेतकऱ्यांना ‘घामाचे दाम मिळत नाही’ त्यामुळे शेतात राबूनही शेतकऱ्यांची झोळी अजूनही रितीच आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ गेले कुठे?शेतकऱ्यांचे अच्छे दिन येईल, असे स्वप्न निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारने दाखविले होते. शेतकऱ्यांनाही आपले सुखाचे दिवस येईल, अशी आस होती. मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अच्छे दिनच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे.