शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल बाजारभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:33 IST

ब्रह्मपुरी : सर्वत्र महागाईने उचांक गाठला असताना शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीचा खर्चही काढणे ...

ब्रह्मपुरी : सर्वत्र महागाईने उचांक गाठला असताना शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीचा खर्चही काढणे कठीण झाले आहे. परिणामी, भाजीपाला गुरांना चारावा लागत असल्याचे वास्तव तालुक्यात दिसत आहे.

ब्रह्मपुरी तालुक्याला वैनगंगा नदीने वेढले आहे. त्यामुळे नदीतीरावरील ४० - ५० गावांतील शेतकऱ्यांची शेती सुपीक आहे. येथील माती काळीभोर असल्याने पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे या जमिनीची सुपीकता टिकून राहते. म्हणूनच येथील शेतकरी भात पिकासह भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. एरवी या मालाला बाजारात चांगला भाव मिळतो. मात्र, ऐन पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर अत्यंत कमी आहेत. १० - १५ किमी अंतरावरून शेतकऱ्यांना दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने बाजारात शेतमाल आणावा लागतो; परंतु बाजारात ठोक दराने किरकोळ विक्रेते हा माल खरेदी करताना अत्यंत कमी दराने खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चदेखील निघत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना गुरांना भाजीपाला खाऊ घालावा लागतो.

बॉक्स

प्रति किलो दर

भेंडी - २ रुपये

शिमला मिरची - २५ रु.

दोडका - ८ रु.

फुलकोबी - ३० रु.

पान कोबी - २० रु.

सांबार - ५० ते ६० रु.

कारले - २ रु.

कोट

दरवर्षी भात पिकासह उदरनिर्वाहासाठी भाजीपाला लागवड करतो. मात्र, यावेळी अतिशय कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. लागवड, तोडणी तथा वाहतूक खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करणेदेखील मुश्कील झाले आहे.

- विलाप तुपट,

शेतकरी, पारडगाव.

030921\img_20210903_154716.jpg

भाजीपाला विकताना विक्रेते