शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल बाजारभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:33 IST

ब्रह्मपुरी : सर्वत्र महागाईने उचांक गाठला असताना शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीचा खर्चही काढणे ...

ब्रह्मपुरी : सर्वत्र महागाईने उचांक गाठला असताना शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीचा खर्चही काढणे कठीण झाले आहे. परिणामी, भाजीपाला गुरांना चारावा लागत असल्याचे वास्तव तालुक्यात दिसत आहे.

ब्रह्मपुरी तालुक्याला वैनगंगा नदीने वेढले आहे. त्यामुळे नदीतीरावरील ४० - ५० गावांतील शेतकऱ्यांची शेती सुपीक आहे. येथील माती काळीभोर असल्याने पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे या जमिनीची सुपीकता टिकून राहते. म्हणूनच येथील शेतकरी भात पिकासह भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. एरवी या मालाला बाजारात चांगला भाव मिळतो. मात्र, ऐन पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर अत्यंत कमी आहेत. १० - १५ किमी अंतरावरून शेतकऱ्यांना दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने बाजारात शेतमाल आणावा लागतो; परंतु बाजारात ठोक दराने किरकोळ विक्रेते हा माल खरेदी करताना अत्यंत कमी दराने खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चदेखील निघत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना गुरांना भाजीपाला खाऊ घालावा लागतो.

बॉक्स

प्रति किलो दर

भेंडी - २ रुपये

शिमला मिरची - २५ रु.

दोडका - ८ रु.

फुलकोबी - ३० रु.

पान कोबी - २० रु.

सांबार - ५० ते ६० रु.

कारले - २ रु.

कोट

दरवर्षी भात पिकासह उदरनिर्वाहासाठी भाजीपाला लागवड करतो. मात्र, यावेळी अतिशय कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. लागवड, तोडणी तथा वाहतूक खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करणेदेखील मुश्कील झाले आहे.

- विलाप तुपट,

शेतकरी, पारडगाव.

030921\img_20210903_154716.jpg

भाजीपाला विकताना विक्रेते