शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

हंगाम तोंडावर असताना मान-अपमानात अडकला खरीप आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

एक वर्षापासून कोरोनाच्या संकटातच शेतकरी हंगाम पूर्ण करीत आहेत. यंदाच्या तुलनेत गतवर्षीचा कडक लॉकडाऊन शेतकऱ्यांना तापदायक ठरला होता. पेरणीपूर्व ...

एक वर्षापासून कोरोनाच्या संकटातच शेतकरी हंगाम पूर्ण करीत आहेत. यंदाच्या तुलनेत गतवर्षीचा कडक लॉकडाऊन शेतकऱ्यांना तापदायक ठरला होता. पेरणीपूर्व हंगामापासून तर उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना मरणयातना सोसाव्या लागल्या. निसर्गाने साथ दिल्याने बऱ्यापैकी उत्पादन झाले ही जमेची बाजू होय. परंतु, विक्री व्यवस्थेची साखळी तुटल्याने गतवर्षी हजारो शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यातच सुलतानी कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या तुलनेत फारसे उत्पादन वाट्याला आले नाही. कृषी कर्जाअभावी काही शेतकऱ्यांची कोंडी झाली. पण, कडक लॉकडाऊनमुळे अन्य क्षेत्रांची पिछाडी होत असताना शेतीचे रहाटगाडगे मात्र सुरळीत होते. यंदा पुन्हा ऐन हंगामातच कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या कृषिक्षेत्राच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाला दीर्घकालीन हिताची सांगड घालण्यातच खरे हित आहे.

विलंब झाल्यास शेतीचेच नुकसान

पीक घेण्यासाठी स्वत:ला मातीत गाडून घेणाऱ्या शेतकऱ्यांना मान-अपमान नाटकात कोण दोषी आणि कोण खरे, याबाबत देणे-घेणे नाही. खरीप हंगाम नियोजन आराखड्याच्या मंजुरी देताना विलंब झाल्यास पुढील प्रत्येक टप्प्यावर थेट शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, याचीच अनेकांनी भीती आहे. गतवर्षी तर कडक लॉकडाऊन असतानाही तत्परता दाखविण्यात आली होती, हे विशेष.

बैठकीत विधायक सूचनांचा सुकाळ!

गतवर्षी कडक लॉकडाऊन असतानाही आराखड्यावर शिक्कामोर्तब झाले आणि खरीप हंगाम पूर्ण होऊ शकला. एकतर नियोजन बैठकीत विधायक सूचना करणाऱ्यांचा सुकाळ असतो, हे आजवरच्या अनेक बैठकांतून पुढे आले आहे. त्यामुळे मानसन्मानात आराखडा अडकविण्यापेक्षा शेतकरी हिताकडे लक्ष देणे यातच खरी राजकीय परिपक्वता आहे.

चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर खरीप नियोजन

लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा खरीप हंगामात चार लाख ८२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन आहे. गतवर्षी चार लाख ६३ हजार १८३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा भात व कपाशीचे लागवड क्षेत्र वाढविण्यात आले आहे. भाजीपाला व पिकांचे क्षेत्र नऊ हजारावरून बारा हजार हेक्टर नियोजित करण्यात आले.

पीकनिहाय क्षेत्र- हेक्टर

भात- एक लाख ८५ हजार

सोयाबीन- ५७ हजार २००

कापूस- एक लाख ८८ हजार

तूर- ४० हजार

इतर- १२ हजार