शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

हंगाम तोंडावर असताना मान-अपमानात अडकला खरीप आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

एक वर्षापासून कोरोनाच्या संकटातच शेतकरी हंगाम पूर्ण करीत आहेत. यंदाच्या तुलनेत गतवर्षीचा कडक लॉकडाऊन शेतकऱ्यांना तापदायक ठरला होता. पेरणीपूर्व ...

एक वर्षापासून कोरोनाच्या संकटातच शेतकरी हंगाम पूर्ण करीत आहेत. यंदाच्या तुलनेत गतवर्षीचा कडक लॉकडाऊन शेतकऱ्यांना तापदायक ठरला होता. पेरणीपूर्व हंगामापासून तर उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना मरणयातना सोसाव्या लागल्या. निसर्गाने साथ दिल्याने बऱ्यापैकी उत्पादन झाले ही जमेची बाजू होय. परंतु, विक्री व्यवस्थेची साखळी तुटल्याने गतवर्षी हजारो शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यातच सुलतानी कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या तुलनेत फारसे उत्पादन वाट्याला आले नाही. कृषी कर्जाअभावी काही शेतकऱ्यांची कोंडी झाली. पण, कडक लॉकडाऊनमुळे अन्य क्षेत्रांची पिछाडी होत असताना शेतीचे रहाटगाडगे मात्र सुरळीत होते. यंदा पुन्हा ऐन हंगामातच कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या कृषिक्षेत्राच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाला दीर्घकालीन हिताची सांगड घालण्यातच खरे हित आहे.

विलंब झाल्यास शेतीचेच नुकसान

पीक घेण्यासाठी स्वत:ला मातीत गाडून घेणाऱ्या शेतकऱ्यांना मान-अपमान नाटकात कोण दोषी आणि कोण खरे, याबाबत देणे-घेणे नाही. खरीप हंगाम नियोजन आराखड्याच्या मंजुरी देताना विलंब झाल्यास पुढील प्रत्येक टप्प्यावर थेट शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, याचीच अनेकांनी भीती आहे. गतवर्षी तर कडक लॉकडाऊन असतानाही तत्परता दाखविण्यात आली होती, हे विशेष.

बैठकीत विधायक सूचनांचा सुकाळ!

गतवर्षी कडक लॉकडाऊन असतानाही आराखड्यावर शिक्कामोर्तब झाले आणि खरीप हंगाम पूर्ण होऊ शकला. एकतर नियोजन बैठकीत विधायक सूचना करणाऱ्यांचा सुकाळ असतो, हे आजवरच्या अनेक बैठकांतून पुढे आले आहे. त्यामुळे मानसन्मानात आराखडा अडकविण्यापेक्षा शेतकरी हिताकडे लक्ष देणे यातच खरी राजकीय परिपक्वता आहे.

चार लाख ८२ हजार ८८ हेक्टरवर खरीप नियोजन

लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा खरीप हंगामात चार लाख ८२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन आहे. गतवर्षी चार लाख ६३ हजार १८३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यंदा भात व कपाशीचे लागवड क्षेत्र वाढविण्यात आले आहे. भाजीपाला व पिकांचे क्षेत्र नऊ हजारावरून बारा हजार हेक्टर नियोजित करण्यात आले.

पीकनिहाय क्षेत्र- हेक्टर

भात- एक लाख ८५ हजार

सोयाबीन- ५७ हजार २००

कापूस- एक लाख ८८ हजार

तूर- ४० हजार

इतर- १२ हजार