शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

रखरखत्या उन्हात बळीराजा शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 01:26 IST

सतत दोन वर्ष नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी कर्जबाजारी झाला असला तरी निराश झालेला नाही.

चंद्रपूर: सतत दोन वर्ष नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी कर्जबाजारी झाला असला तरी निराश झालेला नाही. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस तो बाळगून आहे. पुढील महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. मे महिना आता संपायला आला आहे. उन्हाच्या दाहकतेची पर्वा न करता शेतकऱ्यांची शेतातील लगबगही सुरू झाली आहे. हंगामपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला. उन्हाची दहाकता या कामात अडथळा आणत असली तरी दुपारचा कालावधी सोडून शेतकरी शेतात रमू लागला आहे.मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने लहरीपणा दाखविणे सुरू केले. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. विशेष म्हणजे, २०१३ आणि २०१४ असे सातत्याने दोन वर्ष शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. २०१३ मध्ये तर खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. २०१४ मध्ये थोडेफार उत्पन्न झाले. मात्र नुकसान टळू शकले नाही. त्यानंतर आता रबी हंगामात हे नुकसान भरून निघेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी चांगली पेरणी केली. मात्र यावेळीही पावसानेच शेतकऱ्यांच्या हातचे हिसकावून नेले. ऐन पिक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.निसर्गाची ही अवकृपा विसरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरिपाची तयारी करीत आहे. शेतातील नांगरणी, वखरणीची कामे सुरू करण्यात आली आहे. यावर्षी एप्रिल आणि चालू मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतात अनावश्यक कचरा वापलेला आहे. तोदेखील काढणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. काही शेतकरी शेतात आधीच शेणखत टाकतात. सध्या सुर्याचा पारा ४७ अंशापार गेला आहे. उन्हाची दाहकता असह्य होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच उन्हाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. (शहर प्रतिनिधी)पावणेपाच लाखांवर नियोजनयंदा कृषी विभागाने चार लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असा अंदाज आहे. यंदा कापसाचा पेरा वाढून एक लाख ३४ हजार ८२७ हेक्टरवर जाण्याचा अंदाज कृषी विभागाला आहे. सोयाबीनचा पेरा १ लाख १८ हजार ४७४ हेक्टरवर होणार आहे. पुन्हा कर्जाचे ओझेमागील वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागील वर्षी घेतलेले कर्ज अनेक शेतकरी फेडू शकले नाही. आता खरीप हंगाम पुन्हा तोंडावर आला आहे. कर्ज डोक्यावर घेऊन पुन्हा शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहे. पुन्हा सावकराच्या दारात शेतकरी उभा ठाकला आहे. कर्जाचे ओझे यावेळी आणखी वाढणार आहे. अशावेळी निसर्गाची कृपा महत्त्वाची राहणार आहे.बियाणांची स्थितीकृषी विभागाने या खरीप हंगामासाठी ९९ हजार ६५९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. यातील १८ हजार ३१४ क्विंटल बियाणे कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. यंदा तीन हजार ३४ क्विंटल कापूस बियाणे लागण्याची शक्यता आहे. मात्र यापैकी आता केवळ ४२७ क्विंटलच बियाणे कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. सोयाबीनचे १४ हजार १४ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. खताची स्थितीयंदा कृषी विभागाने खरिपासाठी एक लाख १० हजार ५० मेट्रिक टन खताची मागणी केली आहे. शासनाने एक लाख १० हजार २०० मेट्रीक टन खते जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. यातील २४ हजार ७८८ मेट्रिक टन खते कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. येत्या दोन दिवसात आणखी सात हजार मेट्रिक टन खत येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी सांगितले. खतांची पुढे चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे.