शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कारगीलच्या आठवणी रोमांच उभे करतात...

By admin | Updated: July 26, 2015 01:36 IST

‘सर्व बाजूंनी पसरलेला बर्फ, प्रतिकूल हवामान, उंचावरुन होत असलेला शत्रूचा मारा आणि या साऱ्याला तोंड देत प्रखर देशभक्तीने ओतप्रोत भरलेले भारतीय सैनिक. ..

चंद्रपूर : ‘सर्व बाजूंनी पसरलेला बर्फ, प्रतिकूल हवामान, उंचावरुन होत असलेला शत्रूचा मारा आणि या साऱ्याला तोंड देत प्रखर देशभक्तीने ओतप्रोत भरलेले भारतीय सैनिक. शत्रूला या भूमीवर पायही ठेवू द्यायचा नाही, या निर्धाराने पुढे सरसावतात, एकक ठाणं काबीज करत विजयी होतात, हे दृश्य आजही आठवते आणि त्या साऱ्या आठवणी अंगावर रोमांच उभे करतात, देशासाठी सर्वस्व बहाल करण्याची उर्मी वारंवार जागी करतात’ सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे सैनिकी प्रशिक्षक तथा मुख्य प्रशिक्षण अधिकारी कमलसिंग थापा बोलत होते. बोलताना त्यांच्या शब्दातून कारगिल युद्धाचा थरार स्पष्ट जाणवत होता. २६ जुलै रोजी कारगील दिन आहे. या निमित्ताने प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. यावेळी युध्दातील थरारक आठवणींना या योध्दांनी उजाळा दिला.१९९९ च्या कारगील युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले कमलसिंग थापा युद्धाच्या आठवणी सांगताना म्हणाले, ‘मी त्यावेळी नायब सुभेदार होतो. पॉईट ४८७५ वर चढाई करण्याचा आम्हाला आदेश मिळाला. शत्रूसैन्य सतत फायरिंग करत होते. त्यांना तसेच प्रत्यूत्तर देत आम्ही चढाई करत होतो. उंचावरुन लढणे त्यांना जेवढे सोपे तेवढेच आम्हाला कठीण होते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आम्ही शत्रूला परास्त केले व ती जागा सर केली. या लढाईत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळणे हे मी माझे सौभाग्य समजतो.’कमलसिंग थापा हे मूळचे हिमाचल प्रदेशचे असून सैन्यातून निवृत्त झाल्यावरही देशसेवेचे माध्यम म्हणून येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षक या पदावर ते रुजू झाले. भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले दीपक भोयर हेसुद्धा सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षण म्हणून कार्यरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातले ब्रह्मपुरी हे त्यांचे मूळ गाव. कारगील युद्धप्रसंगी त्यांची श्रीनगर येथे नेमणूक होती. लढाऊ विमानांची निगा राखणे, काळजी घेणे व लढाईच्या दृष्टीने लढाऊ विमानांची सिद्धता करणे ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. वायुदलाची या युद्धात महत्त्वाची भूमिका होती. अत्यंत जोखमीची ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. या युद्धात सामील होता आले, याचे त्यांनाही समाधान वाटते. युद्धाच्या वेळी वायुसेनेत ते सार्जंट या पदावर कार्यरत होते.दीपक भोयर व कमलसिंग थापा दोघांनीही निवृत्तीनंतर देशसेवा करता यावी म्हणून सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षक म्हणून कार्य करणे पसंत केले. उद्याचे सैनिक घडवताना दोघांनाही समाधान वाटते. विद्यार्थ्यांनीही त्यांच्याप्रमाणे सैनिक व्हावे, अशी दोघांचीही भावना असून त्या दृष्टीने विद्यार्थी परिपूर्ण व्हावेत, यासाठी ते प्रशिक्षण देत असतात. विद्यार्थी जेव्हा त्यांचे सैन्यातले व युद्धाचे अनुभव ऐकतात, तेव्हा रोमांचित होतात व त्यांच्यासारखे व्हायचे, हे मनोमन ठरवतात. कमलसिंग थापा यांना मिळालेली शौर्यपदके पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांना सार्थकतेचे समाधान देतात. विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांना नवी उमेद देतो व हे विद्यार्थी नक्कीच आपल्यासारखे कार्य करतील, असा दोघांनाही विश्वास वाटतो.( प्रतिनिधी)