शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

कपाशीचे पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: October 6, 2015 01:13 IST

माजरी वस्तीत राहणारे शेतकरी सुरेश दैवलकर यांच्या नऊ एकर शेतातील कपाशीच्या वाणाची झाडे पूर्णत: वाळली

कुचना : माजरी वस्तीत राहणारे शेतकरी सुरेश दैवलकर यांच्या नऊ एकर शेतातील कपाशीच्या वाणाची झाडे पूर्णत: वाळली असून याची तक्रार कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व संबंधित कंपनीकडे शेतकऱ्याने केली आहे. याची दध्खल घेत त्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करुन शेतातील कपाशीची झाडे व माती परीक्षणासाठी नागपूरच्या कापूस संशोधन व प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आली आहेत. कपाशीचे झाडे का करपली याबाबत अनिश्चीतता असून पून्हा एकदा शेताची पाहणी होणार आहे. सुरेश दैवलकर यांचे पीक नष्ट झाल्याने शेजारचे शेतकरी सुद्धा चिंतीत असून त्यांचीही कपाशीची झाडे काही प्रमाणात करपत आहेत. त्यामुळे बीज कंपनीकडे नुकसान भरपाईच्या मागणी करण्याचा विचार शेतकरी करीत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता शेतकरी सुरेश दैवलकर यांनी आपली कैफीयत मांडताना ट्रॅक्टरने नांगरणीचे तीन हजार, बियाणे खरेदी २० हजार, खते व कीटकनाशके ७० हजार, निंदण, मजुरी खर्च ६५ हजार तर नोकराचा खर्च ७२ हजार असा एकूण २ लाख ७५ हजाराचा खर्च आतापर्यंत कपाशी पिकावर केला आहे. दरवर्षी याच शेतात ९७ ते ११५ क्विंटल कापूस उत्पादन ते घेत होतो. त्यामुळे यावर्षीही जमिनीची मशागत करून कपाशी पिकाची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले.दैवलकर यांच्या तक्रारीनंतर भद्रावतीचे तालुका कृषी अधिकारी पेचे, पर्यवेक्षक कोसूरकर यांच्यासह बीज कंपनीचे विक्रय अधिकारी सुरेश लिंगमवार यांनी शेतीची पाहणी केली. करपलेल्या कपाशीचे झाडे व माती परीक्षणासाठी नागपूरच्या कापूस संंशोधन व प्रक्रिया केंद्रात स्वत: कृषी पर्यवेक्षक कोसुरकर यांनी पोहोचवले. तेथील विभाग प्रमुख डॉ. केशव क्रांती यांनी प्राथमिक अंदाजाने हा निकृष्ट बियाण्याचा प्रकोप असून शेतीच्या मातीची काहीही समस्या नसल्याचे सांगितले.दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने तालुका कृषी अधिकारी पेचे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असता पंजाबराव कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, महाबीज तथा बियाणे कंपनीचे प्रतिनिधी व कापूस संशोधन केंद्र नागपूरचे संशोधक यांच्याकडून पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. पाहणीनंतरच संबंधित शेतकऱ्याने बियाणे पेरणीपासून त्या कपाशीवर खते, कीटकनाशके इत्यादीचा कसा वापर केला यासह मोका चौकशी करुन शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार काय?४प्राथमिक अंदाजानुसार कंपनीने पुरविलेल्या कपाशीच्या वाणाची बीज गुणवत्ता दोषपूर्ण आढळल्याची माहिती असून हाच निर्णय प्रत्यक्ष पाहणीनंतर कायम झाल्यास कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हा व विभागीय स्तरावर तसा अहवाल पाठविला जातो. त्या अहवालाची नोंद कृषी आयुक्तांनी घेतल्यास संबंधित कंपनीवर विक्री व उत्पादन बंदीसुद्धा आणल्या जाते. तर दुसरीकडे संबंधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बीज कंपनीने दिली नाही तर स्वत: राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून न्यायालयात नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यासोबत कृषी विभाग राहून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत केली जाते. ही प्रक्रिया दुसऱ्या चौकशीदरम्यान स्पष्ट होईल.