शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीचे पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: October 6, 2015 01:13 IST

माजरी वस्तीत राहणारे शेतकरी सुरेश दैवलकर यांच्या नऊ एकर शेतातील कपाशीच्या वाणाची झाडे पूर्णत: वाळली

कुचना : माजरी वस्तीत राहणारे शेतकरी सुरेश दैवलकर यांच्या नऊ एकर शेतातील कपाशीच्या वाणाची झाडे पूर्णत: वाळली असून याची तक्रार कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व संबंधित कंपनीकडे शेतकऱ्याने केली आहे. याची दध्खल घेत त्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करुन शेतातील कपाशीची झाडे व माती परीक्षणासाठी नागपूरच्या कापूस संशोधन व प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आली आहेत. कपाशीचे झाडे का करपली याबाबत अनिश्चीतता असून पून्हा एकदा शेताची पाहणी होणार आहे. सुरेश दैवलकर यांचे पीक नष्ट झाल्याने शेजारचे शेतकरी सुद्धा चिंतीत असून त्यांचीही कपाशीची झाडे काही प्रमाणात करपत आहेत. त्यामुळे बीज कंपनीकडे नुकसान भरपाईच्या मागणी करण्याचा विचार शेतकरी करीत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता शेतकरी सुरेश दैवलकर यांनी आपली कैफीयत मांडताना ट्रॅक्टरने नांगरणीचे तीन हजार, बियाणे खरेदी २० हजार, खते व कीटकनाशके ७० हजार, निंदण, मजुरी खर्च ६५ हजार तर नोकराचा खर्च ७२ हजार असा एकूण २ लाख ७५ हजाराचा खर्च आतापर्यंत कपाशी पिकावर केला आहे. दरवर्षी याच शेतात ९७ ते ११५ क्विंटल कापूस उत्पादन ते घेत होतो. त्यामुळे यावर्षीही जमिनीची मशागत करून कपाशी पिकाची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले.दैवलकर यांच्या तक्रारीनंतर भद्रावतीचे तालुका कृषी अधिकारी पेचे, पर्यवेक्षक कोसूरकर यांच्यासह बीज कंपनीचे विक्रय अधिकारी सुरेश लिंगमवार यांनी शेतीची पाहणी केली. करपलेल्या कपाशीचे झाडे व माती परीक्षणासाठी नागपूरच्या कापूस संंशोधन व प्रक्रिया केंद्रात स्वत: कृषी पर्यवेक्षक कोसुरकर यांनी पोहोचवले. तेथील विभाग प्रमुख डॉ. केशव क्रांती यांनी प्राथमिक अंदाजाने हा निकृष्ट बियाण्याचा प्रकोप असून शेतीच्या मातीची काहीही समस्या नसल्याचे सांगितले.दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने तालुका कृषी अधिकारी पेचे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असता पंजाबराव कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, महाबीज तथा बियाणे कंपनीचे प्रतिनिधी व कापूस संशोधन केंद्र नागपूरचे संशोधक यांच्याकडून पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. पाहणीनंतरच संबंधित शेतकऱ्याने बियाणे पेरणीपासून त्या कपाशीवर खते, कीटकनाशके इत्यादीचा कसा वापर केला यासह मोका चौकशी करुन शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार काय?४प्राथमिक अंदाजानुसार कंपनीने पुरविलेल्या कपाशीच्या वाणाची बीज गुणवत्ता दोषपूर्ण आढळल्याची माहिती असून हाच निर्णय प्रत्यक्ष पाहणीनंतर कायम झाल्यास कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हा व विभागीय स्तरावर तसा अहवाल पाठविला जातो. त्या अहवालाची नोंद कृषी आयुक्तांनी घेतल्यास संबंधित कंपनीवर विक्री व उत्पादन बंदीसुद्धा आणल्या जाते. तर दुसरीकडे संबंधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बीज कंपनीने दिली नाही तर स्वत: राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून न्यायालयात नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यासोबत कृषी विभाग राहून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत केली जाते. ही प्रक्रिया दुसऱ्या चौकशीदरम्यान स्पष्ट होईल.