शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

कपाशीचे पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: October 6, 2015 01:13 IST

माजरी वस्तीत राहणारे शेतकरी सुरेश दैवलकर यांच्या नऊ एकर शेतातील कपाशीच्या वाणाची झाडे पूर्णत: वाळली

कुचना : माजरी वस्तीत राहणारे शेतकरी सुरेश दैवलकर यांच्या नऊ एकर शेतातील कपाशीच्या वाणाची झाडे पूर्णत: वाळली असून याची तक्रार कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी व संबंधित कंपनीकडे शेतकऱ्याने केली आहे. याची दध्खल घेत त्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करुन शेतातील कपाशीची झाडे व माती परीक्षणासाठी नागपूरच्या कापूस संशोधन व प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आली आहेत. कपाशीचे झाडे का करपली याबाबत अनिश्चीतता असून पून्हा एकदा शेताची पाहणी होणार आहे. सुरेश दैवलकर यांचे पीक नष्ट झाल्याने शेजारचे शेतकरी सुद्धा चिंतीत असून त्यांचीही कपाशीची झाडे काही प्रमाणात करपत आहेत. त्यामुळे बीज कंपनीकडे नुकसान भरपाईच्या मागणी करण्याचा विचार शेतकरी करीत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता शेतकरी सुरेश दैवलकर यांनी आपली कैफीयत मांडताना ट्रॅक्टरने नांगरणीचे तीन हजार, बियाणे खरेदी २० हजार, खते व कीटकनाशके ७० हजार, निंदण, मजुरी खर्च ६५ हजार तर नोकराचा खर्च ७२ हजार असा एकूण २ लाख ७५ हजाराचा खर्च आतापर्यंत कपाशी पिकावर केला आहे. दरवर्षी याच शेतात ९७ ते ११५ क्विंटल कापूस उत्पादन ते घेत होतो. त्यामुळे यावर्षीही जमिनीची मशागत करून कपाशी पिकाची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले.दैवलकर यांच्या तक्रारीनंतर भद्रावतीचे तालुका कृषी अधिकारी पेचे, पर्यवेक्षक कोसूरकर यांच्यासह बीज कंपनीचे विक्रय अधिकारी सुरेश लिंगमवार यांनी शेतीची पाहणी केली. करपलेल्या कपाशीचे झाडे व माती परीक्षणासाठी नागपूरच्या कापूस संंशोधन व प्रक्रिया केंद्रात स्वत: कृषी पर्यवेक्षक कोसुरकर यांनी पोहोचवले. तेथील विभाग प्रमुख डॉ. केशव क्रांती यांनी प्राथमिक अंदाजाने हा निकृष्ट बियाण्याचा प्रकोप असून शेतीच्या मातीची काहीही समस्या नसल्याचे सांगितले.दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने तालुका कृषी अधिकारी पेचे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असता पंजाबराव कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, महाबीज तथा बियाणे कंपनीचे प्रतिनिधी व कापूस संशोधन केंद्र नागपूरचे संशोधक यांच्याकडून पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. पाहणीनंतरच संबंधित शेतकऱ्याने बियाणे पेरणीपासून त्या कपाशीवर खते, कीटकनाशके इत्यादीचा कसा वापर केला यासह मोका चौकशी करुन शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले. (वार्ताहर)शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार काय?४प्राथमिक अंदाजानुसार कंपनीने पुरविलेल्या कपाशीच्या वाणाची बीज गुणवत्ता दोषपूर्ण आढळल्याची माहिती असून हाच निर्णय प्रत्यक्ष पाहणीनंतर कायम झाल्यास कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हा व विभागीय स्तरावर तसा अहवाल पाठविला जातो. त्या अहवालाची नोंद कृषी आयुक्तांनी घेतल्यास संबंधित कंपनीवर विक्री व उत्पादन बंदीसुद्धा आणल्या जाते. तर दुसरीकडे संबंधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बीज कंपनीने दिली नाही तर स्वत: राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून न्यायालयात नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकऱ्यासोबत कृषी विभाग राहून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत केली जाते. ही प्रक्रिया दुसऱ्या चौकशीदरम्यान स्पष्ट होईल.