शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कधी करणी, जादूटोणा; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

महाराष्ट्राला संत चळवळीचा वारसा आहे. संतांनी अलौकिक जीवनाचा अर्थ सांगताना लौकिक जीवनाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. देव-धर्माच्या नावावर चुकीच्या ...

महाराष्ट्राला संत चळवळीचा वारसा आहे. संतांनी अलौकिक जीवनाचा अर्थ सांगताना लौकिक जीवनाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. देव-धर्माच्या नावावर चुकीच्या प्रथा-परंपरा माणुसकीला मातीत घालतात, हे अतिशय सोप्या पद्धतीने संत तुकाराम व कर्मयोगी गाडगेबाबांनी कीर्तनातून समजावून सांगितले. अलीकडे भौतिक सुखाच्या नादी लागलेल्यांनी देवा-धर्माच्या नावावर करणी, चेटूक, भूतबाधा झाल्याचे भासवून अशिक्षित, उच्चशिक्षितांनाही नादी लावणारे बाबाबुवांचे पेव फुटले. आजारपण अथवा संकटात सापडलेल्यांना हेरून नादी लावणाऱ्या अशा बाबांचा अनेकांवर मोठा धाक आहे. त्यांचे शिष्य संकटग्रस्तांना शोधून जाळ्यात ओढत आहेत. यातूनच करणी जादूटोण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार झाला. मात्र, प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने बाबाबुवांना आळा बसला नाही. काही राजकीय नेतेही मतांवर डोळा ठेवून अशा बाबांना अभय देतात. परिणामी, कशी पैशांसाठी पाऊस तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती करण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. कायदा अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्यात ३२ घटनांची नोंद झाली.

बॉक्स

आजारपण अथवा संकटात सापडलेल्यांना हेरून नादी लावणाऱ्या बाबाबुवांचे शहरी व ग्रामीण भागात प्रस्थ वाढत आहे.

बाबाबुवांचे शिष्य नाना प्रकारच्या कथा, कहाण्या, चमत्कार पसरवून संकटग्रस्तांना आपल्या जाळ्यात ओढतात. विशेषत: महिलांच्या आग्रहाखातर संपूर्ण कुटुंबच अंधश्रद्धेच्या गर्तेत ओढले जात आहे.

बॉक्स

कोरोना काळापासून बाबाबुवा वाढले

अशिक्षित,आर्थिक दुर्बलतेशी सामना करणारी अनेक कुटुंबं कोरोना काळापासून पुन्हा समस्यांच्या विळख्यात सापडले. उदरनिर्वाहाची साधने गेली. त्यातच कोरोना महामारीने आरोग्याच्या समस्या वाढविल्या. पोट भरायलाच संघर्ष करावा लागतो तिथे बाबाबुवांनी खोटी स्वप्ने दाखवून आपला स्वार्थ साधणे सुरू केले. गावातच मठ उभारून शिष्यांचा गोतावळा तयार केला.

बॉक्स

नवीन संपर्क साधने ज्ञानासाठी वापरा

मोबाइलने संपर्क साधने वाढविली. मात्र, हजारो वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या अंधश्रद्धेचे किटाळ दूर झाले नाही. मोबाइल व व्हॉट्सॲप या साधनांनी थिल्लर मनोरंजन नव्हे तर ज्ञान व परिवर्तनवादी विचारांसाठी वापरण्याची मनोभूमिका तयार करावी लागणार आहे.

बॉक्स

विकास योजनाही पोहोचवा

अशा कठीण काळात ग्रामीण व शहरी भागातील युवापिढीला विज्ञाननिष्ठ विचारांशी जोडावे लागणार आहे. लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रात अडकवून ठेवल्यास बाबाबुवांचे फावते. त्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. प्रशासकीय यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे.

कोट

लोकांनी श्रद्धा जरूर जोपासावी. मात्र चुकीच्या प्रथा-परंपरा श्रद्धेच्या नावावर स्वीकारू नये. प्रगतीआड येणाऱ्या अनिष्ट प्रथांचा त्याग करावा. विज्ञानवादी विचारांचा स्वीकार करून आयुष्य जगावे. आपल्या आयुष्याचे सूत्र बाबाबुवांकडे कदापि सोपवू नये.

-धनंजय तावाडे, समुपदेशक, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर