शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

कधी करणी, जादूटोणा; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

महाराष्ट्राला संत चळवळीचा वारसा आहे. संतांनी अलौकिक जीवनाचा अर्थ सांगताना लौकिक जीवनाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. देव-धर्माच्या नावावर चुकीच्या ...

महाराष्ट्राला संत चळवळीचा वारसा आहे. संतांनी अलौकिक जीवनाचा अर्थ सांगताना लौकिक जीवनाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. देव-धर्माच्या नावावर चुकीच्या प्रथा-परंपरा माणुसकीला मातीत घालतात, हे अतिशय सोप्या पद्धतीने संत तुकाराम व कर्मयोगी गाडगेबाबांनी कीर्तनातून समजावून सांगितले. अलीकडे भौतिक सुखाच्या नादी लागलेल्यांनी देवा-धर्माच्या नावावर करणी, चेटूक, भूतबाधा झाल्याचे भासवून अशिक्षित, उच्चशिक्षितांनाही नादी लावणारे बाबाबुवांचे पेव फुटले. आजारपण अथवा संकटात सापडलेल्यांना हेरून नादी लावणाऱ्या अशा बाबांचा अनेकांवर मोठा धाक आहे. त्यांचे शिष्य संकटग्रस्तांना शोधून जाळ्यात ओढत आहेत. यातूनच करणी जादूटोण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार झाला. मात्र, प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने बाबाबुवांना आळा बसला नाही. काही राजकीय नेतेही मतांवर डोळा ठेवून अशा बाबांना अभय देतात. परिणामी, कशी पैशांसाठी पाऊस तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती करण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. कायदा अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्यात ३२ घटनांची नोंद झाली.

बॉक्स

आजारपण अथवा संकटात सापडलेल्यांना हेरून नादी लावणाऱ्या बाबाबुवांचे शहरी व ग्रामीण भागात प्रस्थ वाढत आहे.

बाबाबुवांचे शिष्य नाना प्रकारच्या कथा, कहाण्या, चमत्कार पसरवून संकटग्रस्तांना आपल्या जाळ्यात ओढतात. विशेषत: महिलांच्या आग्रहाखातर संपूर्ण कुटुंबच अंधश्रद्धेच्या गर्तेत ओढले जात आहे.

बॉक्स

कोरोना काळापासून बाबाबुवा वाढले

अशिक्षित,आर्थिक दुर्बलतेशी सामना करणारी अनेक कुटुंबं कोरोना काळापासून पुन्हा समस्यांच्या विळख्यात सापडले. उदरनिर्वाहाची साधने गेली. त्यातच कोरोना महामारीने आरोग्याच्या समस्या वाढविल्या. पोट भरायलाच संघर्ष करावा लागतो तिथे बाबाबुवांनी खोटी स्वप्ने दाखवून आपला स्वार्थ साधणे सुरू केले. गावातच मठ उभारून शिष्यांचा गोतावळा तयार केला.

बॉक्स

नवीन संपर्क साधने ज्ञानासाठी वापरा

मोबाइलने संपर्क साधने वाढविली. मात्र, हजारो वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या अंधश्रद्धेचे किटाळ दूर झाले नाही. मोबाइल व व्हॉट्सॲप या साधनांनी थिल्लर मनोरंजन नव्हे तर ज्ञान व परिवर्तनवादी विचारांसाठी वापरण्याची मनोभूमिका तयार करावी लागणार आहे.

बॉक्स

विकास योजनाही पोहोचवा

अशा कठीण काळात ग्रामीण व शहरी भागातील युवापिढीला विज्ञाननिष्ठ विचारांशी जोडावे लागणार आहे. लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रात अडकवून ठेवल्यास बाबाबुवांचे फावते. त्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. प्रशासकीय यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे.

कोट

लोकांनी श्रद्धा जरूर जोपासावी. मात्र चुकीच्या प्रथा-परंपरा श्रद्धेच्या नावावर स्वीकारू नये. प्रगतीआड येणाऱ्या अनिष्ट प्रथांचा त्याग करावा. विज्ञानवादी विचारांचा स्वीकार करून आयुष्य जगावे. आपल्या आयुष्याचे सूत्र बाबाबुवांकडे कदापि सोपवू नये.

-धनंजय तावाडे, समुपदेशक, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर