शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

कधी करणी, जादूटोणा; तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती; अंधश्रद्धेचे भूत कधी उतरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

महाराष्ट्राला संत चळवळीचा वारसा आहे. संतांनी अलौकिक जीवनाचा अर्थ सांगताना लौकिक जीवनाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. देव-धर्माच्या नावावर चुकीच्या ...

महाराष्ट्राला संत चळवळीचा वारसा आहे. संतांनी अलौकिक जीवनाचा अर्थ सांगताना लौकिक जीवनाकडे कदापि दुर्लक्ष केले नाही. देव-धर्माच्या नावावर चुकीच्या प्रथा-परंपरा माणुसकीला मातीत घालतात, हे अतिशय सोप्या पद्धतीने संत तुकाराम व कर्मयोगी गाडगेबाबांनी कीर्तनातून समजावून सांगितले. अलीकडे भौतिक सुखाच्या नादी लागलेल्यांनी देवा-धर्माच्या नावावर करणी, चेटूक, भूतबाधा झाल्याचे भासवून अशिक्षित, उच्चशिक्षितांनाही नादी लावणारे बाबाबुवांचे पेव फुटले. आजारपण अथवा संकटात सापडलेल्यांना हेरून नादी लावणाऱ्या अशा बाबांचा अनेकांवर मोठा धाक आहे. त्यांचे शिष्य संकटग्रस्तांना शोधून जाळ्यात ओढत आहेत. यातूनच करणी जादूटोण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार झाला. मात्र, प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने बाबाबुवांना आळा बसला नाही. काही राजकीय नेतेही मतांवर डोळा ठेवून अशा बाबांना अभय देतात. परिणामी, कशी पैशांसाठी पाऊस तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती करण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. कायदा अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्यात ३२ घटनांची नोंद झाली.

बॉक्स

आजारपण अथवा संकटात सापडलेल्यांना हेरून नादी लावणाऱ्या बाबाबुवांचे शहरी व ग्रामीण भागात प्रस्थ वाढत आहे.

बाबाबुवांचे शिष्य नाना प्रकारच्या कथा, कहाण्या, चमत्कार पसरवून संकटग्रस्तांना आपल्या जाळ्यात ओढतात. विशेषत: महिलांच्या आग्रहाखातर संपूर्ण कुटुंबच अंधश्रद्धेच्या गर्तेत ओढले जात आहे.

बॉक्स

कोरोना काळापासून बाबाबुवा वाढले

अशिक्षित,आर्थिक दुर्बलतेशी सामना करणारी अनेक कुटुंबं कोरोना काळापासून पुन्हा समस्यांच्या विळख्यात सापडले. उदरनिर्वाहाची साधने गेली. त्यातच कोरोना महामारीने आरोग्याच्या समस्या वाढविल्या. पोट भरायलाच संघर्ष करावा लागतो तिथे बाबाबुवांनी खोटी स्वप्ने दाखवून आपला स्वार्थ साधणे सुरू केले. गावातच मठ उभारून शिष्यांचा गोतावळा तयार केला.

बॉक्स

नवीन संपर्क साधने ज्ञानासाठी वापरा

मोबाइलने संपर्क साधने वाढविली. मात्र, हजारो वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या अंधश्रद्धेचे किटाळ दूर झाले नाही. मोबाइल व व्हॉट्सॲप या साधनांनी थिल्लर मनोरंजन नव्हे तर ज्ञान व परिवर्तनवादी विचारांसाठी वापरण्याची मनोभूमिका तयार करावी लागणार आहे.

बॉक्स

विकास योजनाही पोहोचवा

अशा कठीण काळात ग्रामीण व शहरी भागातील युवापिढीला विज्ञाननिष्ठ विचारांशी जोडावे लागणार आहे. लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रात अडकवून ठेवल्यास बाबाबुवांचे फावते. त्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. प्रशासकीय यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे.

कोट

लोकांनी श्रद्धा जरूर जोपासावी. मात्र चुकीच्या प्रथा-परंपरा श्रद्धेच्या नावावर स्वीकारू नये. प्रगतीआड येणाऱ्या अनिष्ट प्रथांचा त्याग करावा. विज्ञानवादी विचारांचा स्वीकार करून आयुष्य जगावे. आपल्या आयुष्याचे सूत्र बाबाबुवांकडे कदापि सोपवू नये.

-धनंजय तावाडे, समुपदेशक, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर