शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

पाण्याअभावी वीज कंपनीतील उत्पादन ठप्प

By admin | Updated: May 6, 2016 01:03 IST

चालू वर्षाच्या सुरूवातीला अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने एप्रिल महिन्यात जलाशये कोरडी पडली आहेत.

वर्धा नदी आटतेयं : वीज भारनियमनाचा बसणार फटकावरोरा : चालू वर्षाच्या सुरूवातीला अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने एप्रिल महिन्यात जलाशये कोरडी पडली आहेत. त्यामुळे वर्धा नदीतून पाणी घेऊन वीजनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना याचा फटका बसला असून उत्पादन मागील आठ दिवसापासून ठप्प झाले आहे. याचा फटका उन्हाळ्यात वीज भारनियमातून नागरिकांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वर्धा नदीतील मार्डा गावाच्या घाटावरुन पाणी घेऊन वरोरा तालुक्यातील उद्योगातील वसाहतीमध्ये असलेल्या साई वर्धा पॉवर व जीएमआर हे वीज निर्मिती प्रकल्प सुरू आहे. जीएमआरमध्ये ६०० मेगावॅट तर साई वर्धा पॉवरमध्ये सध्या १३५ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. या कंपन्यातील काही वीज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला दिली जाते. वर्धा नदीची धार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच आटल्याने वीज निर्मिती प्रकल्पांना वीज निर्मितीकरिता पाणी मिळणे दुरापस्त झाले होते. या प्रकल्पांनी काही दिवस प्रकल्पात पाण्याचा साठा करुन ठेवला होता. तो शिल्लक साठाही संपल्याने १६ एप्रिलपासून पाण्याअभावी वीज निर्मिती बंद केल्याची माहिती सूत्राने दिली आहे. मागील काही वर्षात नजीकच्या पोथरा, अप्पर वर्धा धरणातील पाणी आरक्षित करुन ते नदीमध्ये सोडल्यानंतर प्रकल्प पाण्याचा उपसा करीत होते. परंतु सध्या या धरणामध्येही पुरेसा पाणी साठा उपलब्ध नसल्याने वीज निर्मिती प्रकल्पांना वीज निर्मितीकरिता पाणी मिळणे कठीण झाले आहे. उद्योगामधील वीज निर्मिती ठप्प झाल्याने इतरही कामावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)नदीत पाणी सोडण्याची मागणीवर्धा नदीत धरणातील पाणी सोडण्याची मागणी उद्योगांनी पाटबंधारे विभागाकडे काही दिवसांपूर्वी केली. परंतु नजीकच्या धरणात पुरेसा पाणी साठा उपलब्ध नसल्याने यावर्षी नदीत उन्हाळ्यात पाणी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे पाण्याअभावी प्रकल्प दीड ते दोन महिने बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. राज्यात वीज भार नियमनाची शक्यता नाहीराज्यात परळी वगळता इतर वीज निर्मिती प्रकल्पात पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादन बंद पडणार नाही. राज्याला १६ हजार मेगवॅट विजेची गरज असताना एक हजार मेगावॅट वीज अतिरिक्त आहे. राज्याने २४ हजार मेगावॅट विजेचा करार केला आहे. त्यातच १७ हजार मेगावॅट वीज उलपब्ध होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वीज भारनियमाची शक्यता नाही, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने स्पष्ट केले आहे.