शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्यामुळे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टाचे ..

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांची शासनाने त्वरित पूर्तता करावीचंद्रपूर: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्यामुळे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष अशोक पोफळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या २०१५ च्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीत असहकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ व १३ मार्च २०१५ च्या महासंघासोबतच्या बैठकीत शिक्षण मंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्यांवर आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. तसेच काही मागण्या तीन महिन्यात निकाली काढण्याचे मंत्र्यांनी मान्य केले होते. परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट शासनाकडून नव्याने समस्या निर्माण केल्या जात आहेत. शिक्षकांच्या संच मान्यतेमधील त्रुटी दूर करुन प्रचलित पद्धतीने एप्रिल २०१५ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात संच मान्यता करण्याचे आश्वासन देऊनही आजपर्यंत संच मान्यता झालेली नाही. उलट सदोष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाईन संच मान्यता करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष असून शासनाकडून फसवणूक झाल्याची भावना आहे. तेव्हा शासनाला जागे करण्यासाठी संपूर्ण राज्यातच ९ व १० जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाला २० जुलैपर्यंत मुदतसुद्धा दिलेली होती. परंतु शासनस्तरावरुन कोणताही निर्णय न झाल्यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच यापुढेही निर्णय न घेतल्यास दुसऱ्या टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.२४ जुलैपासून सर्व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक मागण्या मान्य होईपर्यंत काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात २८ जुलैला मुंबई येथील आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात येईल तर चौथ्या टप्प्यात १ आॅगस्टपासून राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. राज्यातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या भावनांचा शासनाने विचार करावा.यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक पोफळे, कार्याध्यक्ष प्रा. वासुदेव कांबळे, जिल्हा सचिव प्रा. वसंत माणूसमारे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. विजय हेलवटे व प्रा. प्रमोद भोयर, संघटन सचिव प्रा. रवींद्र ्रसमर्थ, कोषाध्यक्ष प्रा. सुरेश बुराण, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. व्ही. एस. कोटगीरवार, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. शिवराम रोडे, नंदकिशोर तितीरमारे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)