शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वाघाच्या दहशतीत शिक्षणाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:36 IST

तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे. या परिस्थितीत पद्मापूर येथील पाचवी ते सातवी या वर्गातील २३ विद्यार्थ्यांना घनदाट जंगलातून तीन किमी अंतरावरील भूज येथील शाळेत पाय जावे लागत आहे. वाघाच्या दहशतीत ते शिक्षणाची वारी करीत आहे.पद्मापूर-भूज गट ग्रामपंचायत आहे. पद्मापूरची लोकसंख्या ६८० आहे. या गावात वर्ग पहिली ते चवथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा अस्तित्वात आहे. मात्र इयत्ता पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी तीन किमी अंतरावर असलेल्या भूज येथील शाळेत जावे लागते. पद्मापूर-भूज या मार्गावर अनेकदा सकाळी आणि सायंकाळी सातत्याने पट्टेदार वाघाचे दर्शन होते. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्यास पालक धजावत नाही. त्यामुळे २२० दिवसांपैकी जवळपास १०० दिवसांची शाळा बुडते. रात्री गावात पोहोचायला विद्यार्थ्यांना उशीर व्हायला नको, यासाठी अंधार पडायच्या आत ४ वाजताच शाळेला सुटी दिली जाते. यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी पद्मापूर येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतावर काम करीत असलेल्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. १८ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास पद्मापूर-भूज मार्गावर वाघाने तळ ठोकला होता. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच जाऊ शकले नाहीत.१ मार्चपासून जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. सकाळच्या सुमारास या मार्गावर पट्टेदार वाघाचे हमखास दर्शन होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. मानव विकास मिशनअंतर्गत बस उपलब्ध आहे. परंतु तिची आणि शाळेची वेळ जुळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करीतच शाळेत जावे लागते.

टॅग्स :Tigerवाघ