शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून दुष्काळग्रस्तांची थट्टा

By admin | Updated: December 27, 2014 22:47 IST

२०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन संपूर्ण शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. कोट्यवधींची हानी झाली. शासनाने सर्वेक्षण करून मदतीची घोषणा केली. २५ हजार, २० हजार आणि सात हजार पाचशे

न्यायालयात रिट पिटीशन : घोषणा हजारोंची; मात्र प्रत्यक्ष मदत शे-पाचशेची चंद्रपूर : २०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन संपूर्ण शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. कोट्यवधींची हानी झाली. शासनाने सर्वेक्षण करून मदतीची घोषणा केली. २५ हजार, २० हजार आणि सात हजार पाचशे रुपये असे मदतीचे तीन स्लॅब पाडण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मदत केवळ शे-पाचशे रुपयेच शेतकऱ्यांच्या हाती देऊन दुष्काळग्रस्तांचे अश्रु पुसण्याऐवजी शासनाने त्यांची थट्टा केली. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या विरोधात युवक बिरादरी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन दाखल केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्याच्या प्रारंभीच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन घेतलेले बि-बियाणे पेरल्यानंतर वाहून गेले. परिणामी शेतकऱ्यांना परत बि-बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करावी लागली. आता तर पाऊस उसंत घेईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पावसाचे बरसणे सुरूच राहिले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतर पाऊस सरासरी ओलांडून बरसला. जिल्ह्यात तब्बल तीन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. शेकडो घरे पडून नागरिक बेघर झाले. अनेक मालगुजारी तलावही फुटून शेतशिवारात पाणी शिरले. पूर परिस्थितीमुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून राहिले. बहुतांश शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना चंद्रपूर जिल्ह्यात येऊन पूर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी करावी लागली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेने अतिशय कासवगतीने सर्वेक्षण केले. त्यामुळे अनेक शेतकरी संतप्त झाले होते. सावकाश का होईना, प्रशासनाने सर्वेक्षण करून आपला अहवाल शासनाकडे सादर केला. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र २०१४ ही उजाडले तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यानंतर २०१४ मध्ये काही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. मात्र ही मदत शेतकऱ्यांची बोळवण करणारीच ठरली. केवळ ५०० रुपये, १००० रुपये शेतकऱ्यांच्या हाती टेकवण्यात आले. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना तर ही मदतही मिळाली नाही. त्यामुळे मूल येथील युवक बिरादरी संघटनेने २४ फेब्रुवारी २०१४ रोजी शासनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन दाखल केले आहे. यात राज्य शासनाचे मुख्य सचिव (मुंबई), जिल्हाधिकारी, तहसीलदार, स्टेट बँक आॅफ महाराष्ट्र यांना पार्टी करण्यात आले आहे. न्यायालयानेही १८९७/२०१४ या क्रमांकाने हे पिटीशन दाखल करून घेतले. या पिटीशनद्वारे युवक बिरादरी संघटनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)