शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून दुष्काळग्रस्तांची थट्टा

By admin | Updated: December 27, 2014 22:47 IST

२०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन संपूर्ण शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. कोट्यवधींची हानी झाली. शासनाने सर्वेक्षण करून मदतीची घोषणा केली. २५ हजार, २० हजार आणि सात हजार पाचशे

न्यायालयात रिट पिटीशन : घोषणा हजारोंची; मात्र प्रत्यक्ष मदत शे-पाचशेची चंद्रपूर : २०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन संपूर्ण शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. कोट्यवधींची हानी झाली. शासनाने सर्वेक्षण करून मदतीची घोषणा केली. २५ हजार, २० हजार आणि सात हजार पाचशे रुपये असे मदतीचे तीन स्लॅब पाडण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मदत केवळ शे-पाचशे रुपयेच शेतकऱ्यांच्या हाती देऊन दुष्काळग्रस्तांचे अश्रु पुसण्याऐवजी शासनाने त्यांची थट्टा केली. त्यामुळे सरकारी यंत्रणेच्या विरोधात युवक बिरादरी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन दाखल केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्याच्या प्रारंभीच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन घेतलेले बि-बियाणे पेरल्यानंतर वाहून गेले. परिणामी शेतकऱ्यांना परत बि-बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करावी लागली. आता तर पाऊस उसंत घेईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पावसाचे बरसणे सुरूच राहिले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतर पाऊस सरासरी ओलांडून बरसला. जिल्ह्यात तब्बल तीन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. शेकडो घरे पडून नागरिक बेघर झाले. अनेक मालगुजारी तलावही फुटून शेतशिवारात पाणी शिरले. पूर परिस्थितीमुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून राहिले. बहुतांश शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना चंद्रपूर जिल्ह्यात येऊन पूर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी करावी लागली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेने अतिशय कासवगतीने सर्वेक्षण केले. त्यामुळे अनेक शेतकरी संतप्त झाले होते. सावकाश का होईना, प्रशासनाने सर्वेक्षण करून आपला अहवाल शासनाकडे सादर केला. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र २०१४ ही उजाडले तरी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यानंतर २०१४ मध्ये काही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. मात्र ही मदत शेतकऱ्यांची बोळवण करणारीच ठरली. केवळ ५०० रुपये, १००० रुपये शेतकऱ्यांच्या हाती टेकवण्यात आले. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना तर ही मदतही मिळाली नाही. त्यामुळे मूल येथील युवक बिरादरी संघटनेने २४ फेब्रुवारी २०१४ रोजी शासनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन दाखल केले आहे. यात राज्य शासनाचे मुख्य सचिव (मुंबई), जिल्हाधिकारी, तहसीलदार, स्टेट बँक आॅफ महाराष्ट्र यांना पार्टी करण्यात आले आहे. न्यायालयानेही १८९७/२०१४ या क्रमांकाने हे पिटीशन दाखल करून घेतले. या पिटीशनद्वारे युवक बिरादरी संघटनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)