शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची ८ हजार १४२ कामे पूर्ण

By admin | Updated: September 1, 2016 01:22 IST

पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच हक्काची सिंचन सुविधा निर्माण करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले जलयुक्त शिवार

विविध कामांवर ८४ कोटींचा खर्च : जिल्ह्यात १० हेक्टर क्षेत्र संरक्षित ओलिताखाली चंद्रपूर : पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच हक्काची सिंचन सुविधा निर्माण करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरले आहे. अभियानाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार ३८७ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले असून २० हजार ८७५ टीसीएम इतका पाणीसाठा झाला आहे. या कामांसाठी आतापर्यंत तब्बल ८४ कोटींचा खर्च झाला आहे.सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र हे ब्रीदवाक्य सोबत घेत गेल्यावर्षी हे अभियान सुरू करण्यात आले होते. टंचाईग्रस्त गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हाती घेण्यात आलेले हे अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम असून गेल्या काही दिवसात लोकचळवळ झाली आहे. पाच वर्षात सर्व गावांमध्ये हे अभियान राबविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी २१८ गावांची निवड अभियानासाठी करण्यात आली होती. जलयुक्त शिवार अभियानाची कामे विविध यंत्रणांच्यावतीने केली जात आहे. त्यात कृषी विभागाचा महत्वाचा वाटा असून त्यापाठोपाठ जलसंधारण विभाग, वनविभाग, लघु सिंचन स्थानिकस्तर, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विभागाचा समावेश आहे. आराखड्यानुसार ८ हजार ५४१ कामे प्रस्तावित होती. तर १२७ कोटी रूपयांच्या खर्चाचा समावेश करण्यात आला होता. आराखड्यानुसार प्रस्तावित कामांपैकी ८ हजार २७ कामे पूर्ण झाली आहे.या कामांमध्ये सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, बोडी नुतनीकरण-खोलिकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)२१३ गावांची निवड आराखड्यातील प्रस्तावित कामांसाठी जिल्ह्याला ८६.१७ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी ७३.४४ कोटी रुपये खर्च झाले आहे. टप्प्याने जिल्ह्यातील सर्वच गावात सदर अभियान राबविण्यात येणार असल्याने सन २०१६-१७ या चालू वर्षासाठी पुन्हा २१३ गावांची निवड करण्यात आली आहे. यावर्षासाठी सुध्दा ७ हजार ६५० कामांचा ३३६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेष निधीतून २० कोटींचा निधीजलयुक्त शिवार अभियान ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. कालमर्यादेत सर्वच गावांमध्ये ही योजना राबवायची असल्याने योजनेसाठी निधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला जात आहे. वेगवेगळ्या योजनांवरील निधीसोबतच शासन प्रत्येक जिल्ह्याला विशेष निधी देत आहे. यावर्षीसाठी शासनाने जिल्ह्याला २० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे.