शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

जलयुक्तची ८ हजार १४२ कामे पूर्ण

By admin | Updated: September 1, 2016 01:22 IST

पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच हक्काची सिंचन सुविधा निर्माण करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले जलयुक्त शिवार

विविध कामांवर ८४ कोटींचा खर्च : जिल्ह्यात १० हेक्टर क्षेत्र संरक्षित ओलिताखाली चंद्रपूर : पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच हक्काची सिंचन सुविधा निर्माण करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरले आहे. अभियानाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार ३८७ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले असून २० हजार ८७५ टीसीएम इतका पाणीसाठा झाला आहे. या कामांसाठी आतापर्यंत तब्बल ८४ कोटींचा खर्च झाला आहे.सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र हे ब्रीदवाक्य सोबत घेत गेल्यावर्षी हे अभियान सुरू करण्यात आले होते. टंचाईग्रस्त गावे कायमस्वरूपी टंचाईमुक्त करण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हाती घेण्यात आलेले हे अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम असून गेल्या काही दिवसात लोकचळवळ झाली आहे. पाच वर्षात सर्व गावांमध्ये हे अभियान राबविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी २१८ गावांची निवड अभियानासाठी करण्यात आली होती. जलयुक्त शिवार अभियानाची कामे विविध यंत्रणांच्यावतीने केली जात आहे. त्यात कृषी विभागाचा महत्वाचा वाटा असून त्यापाठोपाठ जलसंधारण विभाग, वनविभाग, लघु सिंचन स्थानिकस्तर, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विभागाचा समावेश आहे. आराखड्यानुसार ८ हजार ५४१ कामे प्रस्तावित होती. तर १२७ कोटी रूपयांच्या खर्चाचा समावेश करण्यात आला होता. आराखड्यानुसार प्रस्तावित कामांपैकी ८ हजार २७ कामे पूर्ण झाली आहे.या कामांमध्ये सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, बोडी नुतनीकरण-खोलिकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)२१३ गावांची निवड आराखड्यातील प्रस्तावित कामांसाठी जिल्ह्याला ८६.१७ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी ७३.४४ कोटी रुपये खर्च झाले आहे. टप्प्याने जिल्ह्यातील सर्वच गावात सदर अभियान राबविण्यात येणार असल्याने सन २०१६-१७ या चालू वर्षासाठी पुन्हा २१३ गावांची निवड करण्यात आली आहे. यावर्षासाठी सुध्दा ७ हजार ६५० कामांचा ३३६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेष निधीतून २० कोटींचा निधीजलयुक्त शिवार अभियान ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. कालमर्यादेत सर्वच गावांमध्ये ही योजना राबवायची असल्याने योजनेसाठी निधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला जात आहे. वेगवेगळ्या योजनांवरील निधीसोबतच शासन प्रत्येक जिल्ह्याला विशेष निधी देत आहे. यावर्षीसाठी शासनाने जिल्ह्याला २० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे.