शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जय हिंदचा नारा मनाला उर्जा देणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST

चंद्रपूर : नेताजीच्या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ...

चंद्रपूर : नेताजीच्या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीद्वारे भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ‘जय हिंद’चा नारा देत त्यांनी नवक्रांतीच्या लढ्याला सुरुवात केली. त्यांचा हा नारा आजही मनाला ऊर्जा देणारा आहे. अशा महापुरुषाची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचारही आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त बंगाली कॅम्प येथील नेताजी चौक येथे कार्यक्रम पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शहा, तुषार शोम, यंग चांदा ब्रिगेडचे नितीन शहा, रमेश सरकार, बलराम शहा, गोपी मित्रा, प्राणनाथ राजवर्षी, जे. के. राजवंशी, कमलेश दास, निताई घोष, आशिक हुसेन, पीयूष मंडल, डॉ. विधान बिश्वास, अमोल हलदर, प्रदीप शहा, बलराम शहा, यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार जोरगेवार पुढे म्हणाले, बंगाली कॅम्प येथील मॉं श्री दुर्गा काली माता मंदिर यांच्या वतीने मंदिर परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या परिसराच्या सौदर्यीकरणासाठी पाच लाख तर त्यांच्या वाचनालयासाठी दोन लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.